शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Drought In Marathwada : खरीप हंगाम गेला, रबीचा विचार न केलेलाच बरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:37 IST

दुष्काळवाडा : दुष्काळाच्या वारंवार बसणाऱ्या झळांनी बळीराजाच्या डोळ्यातील अश्रूही सुकले आहेत. हे भयावह चित्र आहे फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी गावचे. 

- रऊफ शेख, गेवराई गुंगी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद

खरीप हंगाम पूर्ण गेल्यात जमा असून, रबी हंगामाचा विचार न केलेलाच बरा. दुष्काळाच्या वारंवार बसणाऱ्या झळांनी बळीराजाच्या डोळ्यातील अश्रूही सुकले आहेत. हे भयावह चित्र आहे फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी गावचे. 

मागच्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला. फुलंब्री तालुका मात्र कोरडाच राहिला. गेल्या तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. यंदाचा दुष्काळ, तर त्यापेक्षाही भयंकर आहे. तीन वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर झाला असून, गावात हाताला काम न राहिल्याने गावातील तरुण आता शहराकडे कामासाठी निघाले आहेत.  

फुलंब्रीपासून २० कि.मी. अंतरावर राजूर रस्त्यावर गेवराई गुंगी हे ३ हजार २०० लोकवस्तीचे गाव वसले आहे. मतदारांची संख्या १ हजार ६००. गाव परिसरातील शेतजमीन ६० टक्के जिरायती व ४० टक्के हंगामी बागायती आहे. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने कापूस, मका, तूर, बाजरी हीच पिके घेतात. गावाला एकही नदी नाही. परिसरात पाणी साठवण करण्यासाठी प्रकल्प नाही. त्यामुळे बागायती शेती करणे शक्य नाही. परिणामी, येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने हंगामाची खात्री देता येत नाही.

खरीप पिके वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गेवराई गुंगी येथे १ हजार ६०० शेतकऱ्यांनी यंदा जून महिन्यात कापूस, मका, तूर, बाजरीची लागवड केली; पण लागवडीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पाऊस पडला नाही. परिणामी, मक्याची वाळलेली झाडे व कपाशीची तुरळक, वाढ न झालेली झाडे सध्या शेतात उभी आहेत. भुईमुगानेही मान टाकली आहे. 

दुबार पेरणीने बळीराजाला कर्जबाजारी केले असून, गावातील दीडशेवर तरुण औरंगाबाद शहरात रोजगारासाठी फिरत आहेत. पुंजाबाई वामन हिवराळे ही महिला शेतकरी म्हणाली, माझ्याकडे सहा एकर शेती असून, त्यातील तीन एकरमध्ये मका पेरला आहे. पावसाअभावी मक्याची वाढ झाली नसून, तो आता वाळत आहे.  खर्चही निघणार नसल्याने मक्याची काढणीसुद्धा करणार नाही. 

९ पाझर तलाव कोरडे परिसरात अनेक वर्षांपूर्वी ९ पाझर तलाव केले गेले आहेत. ते नादुरुस्त आणि गळके आहेत. पावसाचे पाणी आले तरी त्यात साचून राहत नाही. त्यामुळे या तलावांचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. शिवाय गावातील शेतकऱ्यांच्या शेतात ३०० विहिरी आहेत. त्या आजघडीला कोरड्या पडलेल्या आहेत. नजीकच्या करंजिरा व पठाण मळा हे दोन नाले असून, यावर ९ सिमेंट बंधारे आहेत. यंदा पाऊसच नसल्याने त्यात घोटभरही पाणी नाही.  

पावसाळ्यातही टँकर पावसाळा असूनही गेवराई गुंगी येथील लोकांना उन्हाळाच जाणवत आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत ३ टँकर सुरू होते. ते आता बंद झाले असून, गावकरी पुन्हा टँकर सुरू करण्याची मागणी करीत आहेत.  

पशुधनही संकटातपिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. फुलंब्री तालुक्यात सुमारे एक लाख २० हजार जनावरे आहेत. यंदा खरीप हंगामात पाऊस मुबलक पडला नाही. मक्याचा थोडाफार चारा मिळाला असून, रबी हंगाम येणार नसल्याने चाराटंचाई निर्माण होणार आहे.  

दुबार पेरणीही गेली वाया गेवराई गुंगी परिसरात दुबार पेरण्या झाल्या असून, १६ आॅगस्टनंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. - शिरीष घनबहादूर, कृषी अधिकारी, फुलंब्री 

बळीराजा काय म्हणतो? 

- यंदा दुबार पेरणी करूनही पावसाने ऐनवेळी दांडी मारल्याने मशागतीपासून पेरणीपर्यंत केलेला खर्चही निघणार नाही. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. -नामदेव साबळे  

- माझ्या चार एकरमधील कपाशी व मका पूर्णपणे वळून गेली असून शासनाने आर्थिक मदत करावी. तसेच गावात रोजगार हमी योजनेचे काम सुरु करावे. -प्रकाश डकले  

- माझ्याकडे तीन एकर शेती असून यात कपाशी व मकाची लागवड केली होती. पाण्याअभावी ही पिके वाया गेली आहेत. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने येणाऱ्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. -देवीदास म्हस्के 

- बागायती शेती करणेही अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे पावसावर अवलंबून राहावे लागते. यंदाही पावसाने धोका दिल्याने खरीप पिके वाळली असून कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कुठेतरी कामावर जावे लागणार आहे. -उत्तम डकले 

- मागील वर्षीचे बोंडअळीचे अनुदान मिळाले नाही. यंदा खरीप पिके वाया गेली. रबी पिके येणार नसल्याने शासनाच्या मदतीची गरज आहे. शिवाय जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी छावण्या उघडाव्या लागतील. -शेख लतीफ 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी