शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

पुढील वर्षात जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र पूर्ववत करण्याचे विद्यापीठाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 17:14 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad गेल्या वर्षी मार्च - एप्रिलमध्ये संपणाऱ्या परीक्षा ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नवीन शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये सुरू झाले.

ठळक मुद्देपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा एप्रिलमध्ये

औरंगाबाद : कोरोनामुळे संपूर्ण शिक्षणक्षेत्र विस्कळीत झाले आहे. मागील वर्षापासून परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष जून- जुलैऐवजी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये सुरू झाले. यापुढे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून दोन परीक्षांमधील कालावधी दोन-दोन महिन्यांनी कमी करायचा व जून- जुलै २०२२ पासून नवीन शैक्षणिक सत्र पूर्ववत सुरू करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.

गेल्या वर्षी मार्च - एप्रिलमध्ये संपणाऱ्या परीक्षा ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नवीन शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये सुरू झाले. परिणामी, ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी पदवी परीक्षा यंदा १ मार्चपासून, पदव्युत्तर परीक्षा एप्रिलमध्ये, तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा मे महिन्यात घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतल्या जातील. त्यानंतर साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करायचे व जानेवारी २०२२ व मे २०२२ अखेरपर्यंत दोन्ही सत्रांच्या परीक्षा संपवून जून- जुलै २०२२ पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद परिसर व उस्मानाबाद उपपरिसरातील विभागप्रमुखांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. नवीन शैक्षणिक सत्रातील या पहिल्याच बैठकीत अभ्यासक्रम, तासिका, परीक्षा यासह विविध विषयांवर व्यापक चर्चा झाली. यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, सरत्या वर्षात कोरोनामुळे संपूर्ण जग विस्कळीत झाले. शिक्षण क्षेत्रालाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन तासिका घेऊन अभ्यासक्रम संपवावा लागेल व एप्रिलअखेरपर्यंत परीक्षा पूर्ण कराव्यात, अशी सूचना केली. बैठकीचे प्रास्ताविक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी केले. व्यासपीठावर यावेळी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. भालचंद वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सचिन देशमुख यांच्यासह ४८ विभागप्रमुख उपस्थित होते.

विभागांच्या स्वायत्ततेचा मुद्दा ऐरणीवरआता ८०:२० पॅटर्ननुसार परीक्षा घेण्याची कुलगुरु डॉ. येवले यांनी सूचना केली. तेव्हा प्रात्याक्षिक परीक्षेचा मुद्दा चर्चेला आला. त्यावर कुलगुरुंनी विभागप्रमुखांना सांगितले की, विद्यापीठातील विभागप्रमुखांनी समिती स्थापन करून लेखी व प्रात्याक्षिक परीक्षेचे नियोजन करावे. कोरोनाचा संसर्ग वाढतच राहिला, तर प्रात्याक्षिक परीक्षा ऑनलाईन घेता येतील का, याचेही नियोजन या समितीने करावे. विद्यापीठातील विभागांना शैक्षणिक स्वायत्तता नाही, शैक्षणिक निर्णय घेण्यासाठी ‘फ्लेक्झिबिलिटी’ देण्यात आलेली आहे. शैक्षणिक स्वायत्ततेसाठी ‘यूजीसी’कडे प्रस्ताव पाठवावा लागतो. प्रायोगिक तत्त्वावर काही विभागांना असे प्रस्ताव पाठवता येतील.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद