शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

विद्यापीठाच्या तज्ज्ञ समित्या, पार्ट्या अन् लॉबिंग; उच्चशिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 18:55 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार संलग्नता देण्यासाठी विद्यापीठ प्रत्येक महाविद्यालयात प्रतिवर्षी एक तज्ज्ञ समिती पाठवते.

ठळक मुद्देप्राध्यापकाच्या खुनाच्या घटनेनंतर उच्चशिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण

- राम शिनगारेऔरंगाबाद : विद्यापीठाकडून प्राध्यापकांच्या पदोन्नती, महाविद्यालयांच्या संलग्नीकरणासाठी पाठविण्यात येणाऱ्या ‘ तज्ज्ञ ’ समित्या, त्या समित्यांकडून देण्यात येणारे अहवाल आणि रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या ओल्या पार्ट्या सध्या औरंगाबादच्या उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. समित्यांवर सदस्य म्हणून जाण्यासाठी लॉबिंग करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर उच्चशिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. उलटसुलट चर्चेला उधाण आले. हत्या झालेल्या रात्री प्रा. शिंदे हे बाहेरच जेवण करुन रात्री ११.३० वाजता घरी आले होते. त्यापूर्वी ते जळगाव विद्यापीठातून औरंगाबादेत आलेल्या एका प्राध्यापकासोबत होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली. त्यावरून विद्यापीठांच्या समित्यांच्या चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार संलग्नता देण्यासाठी विद्यापीठ प्रत्येक महाविद्यालयात प्रतिवर्षी एक तज्ज्ञ समिती पाठवते. या समितीवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून जाण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे प्रचंड लॉबिंग केली जाते. त्यावरच विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुका लढविल्या जातात. एका समितीवर तीन ते चार जणांचे समायोजन होते.

विद्यापीठातील अधिकारी प्रत्येक गटाचा रोष येऊ नये, यासाठी विविध गटांच्या सदस्यांची वर्णी समित्यांवर लावतात. या समित्यांच्या माध्यमातून प्रत्येक अहवाल ‘मॅनेज’ केला जातो. तीच अवस्था प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या समित्यांची झालेली आहे. प्रत्येक गटाने महाविद्यालये वाटून घेतलेले आहे. वर्षानुवर्षे काही प्राध्यापक एका महाविद्यालयाच्या समित्यांवर जातात. समित्यांच्या माध्यमातून सकारात्मक अहवाल दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ‘श्रम’ परिहार चालतो, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनी दिली. या लाॅबिंगमध्ये सहभागी होणाऱ्या अभ्यासू प्राध्यापकांना मात्र, कोठेच संधी मिळत नसल्याचेही चित्र उच्च शिक्षण वर्तुळात निर्माण झालेले आहे.

गुणवत्तेवर समित्या जात नाहीतविद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात अलिकडे गुणवत्तेवर समित्या पाठविण्यात येत नाहीत. वकूब नसलेल्या लोकांना पाठवले जाते. त्यांचे अहवालही तटस्थ नसतात. सकारात्मक अहवाल देण्यासाठी एक तंत्र विकसित झाल्याचे दिसून येते. त्यातूनच पार्टी, पाकीट संस्कृती उदयाला आली आहे. त्यामुळेच उच्च शिक्षण क्षेत्राची पीछेहाट होत असल्याचे माझे निरीक्षण आहे.- डॉ. एम. ए. वाहूळ , सेवानिवृत्त प्राचार्य

समित्यांची निवड गंभीर वळणावरविद्यापीठाकडून महाविद्यालयाच्या संलग्नतेसाठी पाठविण्यात येणाऱ्या समित्या हा गंभीर विषय बनला आहे. समित्यांवर जाण्यासाठी प्राध्यापकांमध्ये स्पर्धा लागलेली असते. मात्र, कोणत्याही समित्यांकडून तटस्थपणे मूल्यमापन होत नाही. त्यास काही अपवाद ही आहेत. सत्य बोलल्यास प्राध्यापक अंगावर येतात. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे मराठवाड्यातील युवकांच्या पिढ्या उद्ध्वस्त करण्याचे काम होत आहे. ते कुठेतरी थांबले पाहिजे.-ॲड. संजय काळबांडे, सदस्य, अधिसभा, विद्यापीठ 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद