शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

विद्यापीठाच्या तज्ज्ञ समित्या, पार्ट्या अन् लॉबिंग; उच्चशिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 18:55 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार संलग्नता देण्यासाठी विद्यापीठ प्रत्येक महाविद्यालयात प्रतिवर्षी एक तज्ज्ञ समिती पाठवते.

ठळक मुद्देप्राध्यापकाच्या खुनाच्या घटनेनंतर उच्चशिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण

- राम शिनगारेऔरंगाबाद : विद्यापीठाकडून प्राध्यापकांच्या पदोन्नती, महाविद्यालयांच्या संलग्नीकरणासाठी पाठविण्यात येणाऱ्या ‘ तज्ज्ञ ’ समित्या, त्या समित्यांकडून देण्यात येणारे अहवाल आणि रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या ओल्या पार्ट्या सध्या औरंगाबादच्या उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. समित्यांवर सदस्य म्हणून जाण्यासाठी लॉबिंग करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर उच्चशिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. उलटसुलट चर्चेला उधाण आले. हत्या झालेल्या रात्री प्रा. शिंदे हे बाहेरच जेवण करुन रात्री ११.३० वाजता घरी आले होते. त्यापूर्वी ते जळगाव विद्यापीठातून औरंगाबादेत आलेल्या एका प्राध्यापकासोबत होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली. त्यावरून विद्यापीठांच्या समित्यांच्या चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार संलग्नता देण्यासाठी विद्यापीठ प्रत्येक महाविद्यालयात प्रतिवर्षी एक तज्ज्ञ समिती पाठवते. या समितीवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून जाण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे प्रचंड लॉबिंग केली जाते. त्यावरच विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुका लढविल्या जातात. एका समितीवर तीन ते चार जणांचे समायोजन होते.

विद्यापीठातील अधिकारी प्रत्येक गटाचा रोष येऊ नये, यासाठी विविध गटांच्या सदस्यांची वर्णी समित्यांवर लावतात. या समित्यांच्या माध्यमातून प्रत्येक अहवाल ‘मॅनेज’ केला जातो. तीच अवस्था प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या समित्यांची झालेली आहे. प्रत्येक गटाने महाविद्यालये वाटून घेतलेले आहे. वर्षानुवर्षे काही प्राध्यापक एका महाविद्यालयाच्या समित्यांवर जातात. समित्यांच्या माध्यमातून सकारात्मक अहवाल दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ‘श्रम’ परिहार चालतो, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनी दिली. या लाॅबिंगमध्ये सहभागी होणाऱ्या अभ्यासू प्राध्यापकांना मात्र, कोठेच संधी मिळत नसल्याचेही चित्र उच्च शिक्षण वर्तुळात निर्माण झालेले आहे.

गुणवत्तेवर समित्या जात नाहीतविद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात अलिकडे गुणवत्तेवर समित्या पाठविण्यात येत नाहीत. वकूब नसलेल्या लोकांना पाठवले जाते. त्यांचे अहवालही तटस्थ नसतात. सकारात्मक अहवाल देण्यासाठी एक तंत्र विकसित झाल्याचे दिसून येते. त्यातूनच पार्टी, पाकीट संस्कृती उदयाला आली आहे. त्यामुळेच उच्च शिक्षण क्षेत्राची पीछेहाट होत असल्याचे माझे निरीक्षण आहे.- डॉ. एम. ए. वाहूळ , सेवानिवृत्त प्राचार्य

समित्यांची निवड गंभीर वळणावरविद्यापीठाकडून महाविद्यालयाच्या संलग्नतेसाठी पाठविण्यात येणाऱ्या समित्या हा गंभीर विषय बनला आहे. समित्यांवर जाण्यासाठी प्राध्यापकांमध्ये स्पर्धा लागलेली असते. मात्र, कोणत्याही समित्यांकडून तटस्थपणे मूल्यमापन होत नाही. त्यास काही अपवाद ही आहेत. सत्य बोलल्यास प्राध्यापक अंगावर येतात. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे मराठवाड्यातील युवकांच्या पिढ्या उद्ध्वस्त करण्याचे काम होत आहे. ते कुठेतरी थांबले पाहिजे.-ॲड. संजय काळबांडे, सदस्य, अधिसभा, विद्यापीठ 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद