शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

'आंदोलनांची चिंता नको, कामाला लागा'; अमित शाहांचे मराठवाड्यातील ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:10 IST

कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या, अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी निवडणूक आहे. त्यामुळे एकेक जागा जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा. कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यातील किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प करा, असा कानमंत्र भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी पदाधिकारी संवाद बैठकीत दिला. तसेच प्रत्येक बूथवर दहा टक्के मते वाढवा, असे आवाहन केले.

मंगळवारी सायंकाळी एमजीएम कॅम्पसमधील रुक्मिणी सभागृहात झालेल्या मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महामंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विजया रहाटकर, माजी खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात गृहमंत्री शाह यांनी काँग्रेस, महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बघतील. मागच्यावेळी गुजरातेत ३ आंदोलने सुरू होती, तरीही आपण जिंकलो. लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्याची हीच संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

अंतर्गत गटबाजीचे वाद मिटवा....पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील गटबाजीचे भांडण मिटवा. नेत्यांना आपल्या घरी मनधरणीला येण्याची गरज पडणार नाही, असे काम करा. भाजप मागणाऱ्याला काही देत नाही, मात्र न मागणाऱ्याला देतो. प्रत्येक बूथवरील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये घेऊन या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या विजय तुमचा होईल. ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या, असा सल्ला गृहमंत्री शाह यांनी दिला.

फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल....लोकसभा निवडणुकीत असलेली नकारात्मकता आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपल्यावर विशेष नाराज होते. दुष्काळ निसर्गाचा असला तरी तो सरकारने दिलेला असतो, अशी नाराजी लोकांमध्ये असते. महिला मतदानावर फोकस करा, कारण महिला मतदारांना जात, धर्म, पंथ याच्याशी काही घेणं नसते. ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी त्या सदैव राहतात, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMahayutiमहायुतीAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस