शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'आंदोलनांची चिंता नको, कामाला लागा'; अमित शाहांचे मराठवाड्यातील ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:10 IST

कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या, अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी निवडणूक आहे. त्यामुळे एकेक जागा जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा. कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यातील किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प करा, असा कानमंत्र भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी पदाधिकारी संवाद बैठकीत दिला. तसेच प्रत्येक बूथवर दहा टक्के मते वाढवा, असे आवाहन केले.

मंगळवारी सायंकाळी एमजीएम कॅम्पसमधील रुक्मिणी सभागृहात झालेल्या मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महामंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विजया रहाटकर, माजी खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात गृहमंत्री शाह यांनी काँग्रेस, महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बघतील. मागच्यावेळी गुजरातेत ३ आंदोलने सुरू होती, तरीही आपण जिंकलो. लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्याची हीच संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

अंतर्गत गटबाजीचे वाद मिटवा....पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील गटबाजीचे भांडण मिटवा. नेत्यांना आपल्या घरी मनधरणीला येण्याची गरज पडणार नाही, असे काम करा. भाजप मागणाऱ्याला काही देत नाही, मात्र न मागणाऱ्याला देतो. प्रत्येक बूथवरील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये घेऊन या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या विजय तुमचा होईल. ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या, असा सल्ला गृहमंत्री शाह यांनी दिला.

फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल....लोकसभा निवडणुकीत असलेली नकारात्मकता आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपल्यावर विशेष नाराज होते. दुष्काळ निसर्गाचा असला तरी तो सरकारने दिलेला असतो, अशी नाराजी लोकांमध्ये असते. महिला मतदानावर फोकस करा, कारण महिला मतदारांना जात, धर्म, पंथ याच्याशी काही घेणं नसते. ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी त्या सदैव राहतात, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMahayutiमहायुतीAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस