आरटीओ कार्यालयातील कागदपत्रे पडली बेवारस
By Admin | Updated: June 18, 2014 01:34 IST2014-06-18T01:09:57+5:302014-06-18T01:34:56+5:30
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहनचालकांनी सादर केलेले विविध अर्ज आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे वाऱ्यावर सोडल्याची स्थिती आहे.

आरटीओ कार्यालयातील कागदपत्रे पडली बेवारस
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहनचालकांनी सादर केलेले विविध अर्ज आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे वाऱ्यावर सोडल्याची स्थिती आहे.
या कागदपत्रांची योग्य देखभाल करावी किंवा त्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी. या दोन्ही गोष्टींकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
आरटीओ कार्यालयातील लायसन्स फोटो विभागाजवळील खोलीत विविध कागदपत्रे अस्ताव्यस्त पडून आहेत. विशेष म्हणजे या खोलीला बाहेरून लोखंडी जाळी असल्याने या कागदपत्रांची दुरवस्था सहज दिसते.
लोखंडी जाळीतून कागदपत्रे बाहेर पडत आहेत. ही कागदपत्रे सहजरीत्या काढता येत असल्यामुळे त्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. लर्निंग लायसेन्स, कायमस्वरूपी लायसेन्ससह विविध कामांसाठी असलेले अर्ज, कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा केल्यानंतर त्या कागदपत्रांचा डाटा संगणकात फीड होताच त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्याची आवश्यकता
आहे.
गेल्या अनेक वर्षांतील जुन्या कागदपत्रांचा डाटा अद्यापही संगणकात फीड न केल्यामुळेच कागदपत्रे अशी पडून असल्याची शक्यता वर्तविण्यात येत
आहे.
योग्य व्यवस्था करण्याची गरज
ंआरटीओ कार्यालयात कामे घेऊन आलेल्या वाहनधारक व चालकांना अनेक दिवस खेट्या माराव्या लागतात; परंतु कर्मचारी कमी नसल्यामुळे कामे लांबणीवर पडतात, असे अधिकारी सांगतात. कागदपत्रांचा योग्य पद्धतीने सांभाळ करणे आणि विल्हेवाट लावण्यासाठी कर्मचारी नसल्याची जुनीच तक्रार आहे.
कागदपत्रांचा दुरुपयोग
दुसऱ्यांच्या झेरॉक्स कागदपत्रांचा वापर करून मोबाईलचे सीम कार्ड घेणे व अनेकही गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे.
नवे लायसन्स मिळविण्यासाठी जमा केलेले जुने लायसन्स व अन्य कागदपत्रांच्या झेरॉक्स पडून आहेत.
कोणीही हात घालून काढू शकेल, अशी या कागदपत्रांची अवस्था आहे.
छाननी करावी लागेल
आलेल्या कागदपत्रांचा डाटा संगणकात फीड केला जातो. पडून असलेल्या कागदपत्रांची विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या कागदपत्रांची छाननी करावी लागेल; परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
-गोविंद सैंदाणे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी