शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पावसाचे पाणी आमच्या शेतात सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 11:08 PM

औरंगाबाद : सोलापूर औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भालगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी विरुद्ध ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : भूसंपादनानंतर उर्वरित जमिनीतील माती वाहून जाणार

औरंगाबाद : सोलापूर औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भालगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी विरुद्ध दिशेला शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्यात येत आहे. या प्रक्रियेला शेतकºयांनी मंगळवारी कडाडून विरोध दर्शविला. अगोदरच आमच्या जमिनी घेऊन राष्टÑीय महामार्ग करण्यात येत आहे. उर्वरित जमिनीत पाणी सोडल्यास संपूर्ण माती वाहून जाईल, राष्टÑीय महामार्ग अधिकाºयांनी यात मार्ग काढावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अब्दुल वाहब अब्दुल बारी कुरैशी, रफिया बेगम यांनी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, भालगाव येथील गट नं. ३५० मधील ११०० चौरस मीटर क्षेत्र राष्टÑीय महामार्गासाठी २०१६ मध्ये घेण्यात आले. या जागेचा अर्धाच मोबदला मिळाला आहे. उर्वरित मोबदल्यासाठी आजही जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे या भागातील शेतकºयांना झिजवावे लागत आहेत. त्यातच रस्त्याचे काम करणाºया अधिकारी व कंत्राटदारांनी विरुद्ध बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी आमच्या शेतासमोर आणून सोडण्याचा निर्णय घेतला. मोठ-मोठे पाईप टाकून काम सुरू केले. सुरुवातीला शेतासमोर मोठी सिमेंटची नाली बांधून पाणी वाहून नेण्यात येईल, असे शेतकºयांना सांगितले. आता थेट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतात ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यावर पाणी सोडल्यास संपूर्ण माती वाहून जाईल. या कामामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे काम करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी