संतोष दानवे यांची चाय पे चर्चा

By Admin | Updated: April 25, 2016 00:08 IST2016-04-24T23:53:20+5:302016-04-25T00:08:44+5:30

गणेश पंडित , केदारखेडा देशाचे पहिले पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरु यांनी २ फेब्रुवारी १९५७ रोजी ज्याठिकाणी चहा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता

Discussion on Santosh Danve's tea | संतोष दानवे यांची चाय पे चर्चा

संतोष दानवे यांची चाय पे चर्चा

गणेश पंडित , केदारखेडा

देशाचे पहिले पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरु यांनी २ फेब्रुवारी १९५७ रोजी ज्याठिकाणी चहा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. केदारखेडा येथे संतोष दानवे यांची चाय पे चर्चातेथेच भोकरदनचे आ. संतोष दानवे यांनी रविवारी चाय पे चर्चा केली़ यानिमित्ताने ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळाला. केदारखेडा येथील बसस्थानकवर अचानक सकाळी आ़ दानवे हे जालना येथे जात असताना गाडी थाबंवून ग्रामस्थांशी चर्चा केली़ अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत आमदाराची चर्चा ऐकण्यासाठी शेकडोचा जनसमुदाय जमला़ यावेळी ग्रामस्थांनी दुष्काळी स्थिती, जलयुकत शिवार, केदारखेडा मुख्य रस्त्याची समस्या,पिण्याच्या पाण्याची समस्या आदी महत्वपूर्ण बाबी आ़ दानवे यांच्याकडे मांडल्या़ आ़दानवे हे काळजीपूर्वक या गावांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी रमेश मुरकुटे, मधुकर ताबंडे, उत्त मराव ताबंडे,श्रीराम ताबंडे, गंगामामा पवार, निळकंठ ठोबंरे, संचित जाधव, अण्णासाहेब जाधव उपस्थित होतेक़ेदारखेडा येथे २ फेब्रुवारी १९५७ साली भारताचे पहिले पंतप्रधान जवारलाल नेहरु यांचा भोकरदन, जालना दौरा असताना त्यांनी ज्या ठेल्यावर चहा घेतला होता़आणि याच चहा ठेल्याच्या मालकांनी त्यांचा सत्कार केला होता़ आज त्याच ठेल्यावर आ़ संतोष दानवे यांची चाय पे चर्चा झाली़ फरक तो एवढाच त्यावेळी नेहरुजींना चहा पाजण्यासाठी केदारखेडा येथील रेणुकादास लाचुर्ये हे होते़ आज त्यांचा नातु राजेश केदारनाथ लाचुर्ये हे होते़

Web Title: Discussion on Santosh Danve's tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.