शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

शिक्षक नेत्यांविरुद्ध असंतोषाचा उद्रेक

By admin | Updated: January 5, 2016 00:08 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:लाच शिक्षणाधिकारी समजत शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांशी सुरू केलेली अरेरावी,

उस्मानाबाद : जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:लाच शिक्षणाधिकारी समजत शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांशी सुरू केलेली अरेरावी, दडपशाही, दंडेलशाहीविरोधात खदखदणाऱ्या असंतोषाचा सोमवारी उद्रेक झाला़ परिचर एस़ए़लांडगे यांना झालेली शिवीगाळ, मारहाण आणि शिक्षक नेत्यांचा कामकाजात वाढलेला हस्तक्षेप याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी थेट लेखणीबंद आंदोलनाचे हत्यार उपसले़ संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शिक्षकांचे नेते म्हणून घेणाऱ्यांच्या निषेधार्थ कामावर बहिष्कार टाकल्याने सोमवारी शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले होते़जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी यांच्या दालनात परिचर म्हणून काम करणारे एस़ए़लांडगे हे २ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे काम करीत होते़ त्यावेळी कार्यालयातील एका महिला परिचराच्या सांगण्यावरून अल्पसंख्यांक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बशीर तांबोळी व कल्याण बेताळे यांनी परिचर लांडगे यांना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांच्या दालनातच बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली़ या प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत, या अन्यायकारक प्रकाराच्या निषेधार्थ सोमवारी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले़ एकीकडे शासन गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून विविध योजना राबवित आहे़ या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी परिचरापासून शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ मात्र, जिल्ह्यात वाढलेल्या शिक्षक संघटना पाहता शासनाच्या या योजनांनाच खो बसताना दिसत आहे़ विशेषत: संघटना आणि त्यांचे बहुतांश नेते हे शाळा सोडून जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कार्यालयात, आवारातच अधिक भटकत असल्याने कार्यालयात कामकाज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याच्या अनेक तक्रारी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी केल्या. यापूर्वीही जिल्हा परिषदेत व विविध तालुक्यातील गटशिक्षण कार्यालयात स्वत:ला शिक्षकांचे नेते म्हणून घेणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध कारणांनी वेठीस धरून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या तक्रारीही यावेळी कर्मचाऱ्यांनी केल्या. विशेषत: राजकीय पक्षांचे काही संघटनांना पाठबळ असल्याने पदाधिकाऱ्यांनी आता थेट अरेरावी, दंडेलशाही सुरू केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे़ या पदाधिकाऱ्यांची मुजोरी, दंडेलशाही थांबवून त्यांना शाळेवर राहण्याच्या सक्तीच्या सूचना देण्याची गरज असून, वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही अनेक आंदोलकांनी यावेळी केली़ ही मंडळी शाळेवरच थांबली तर शिक्षण विभागाचे कामकाज अधिक दर्जेदार आणि चांगल्या पध्दतीने होईल, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे़शिक्षक संघटनेचे पदाधिकारी कार्यालयीन कामकाजावेळी नेहमीच अरेरावीची भाषा वापरून इच्छेप्रमाणे संचिकेवर अभिप्राय घेवून कार्यालयातील कामकाजात ढवळाढवळ करून हस्तक्षेप करीत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे़ शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे़ या आंदोलनात एफ़जी़गिरी, एऩ पी़ वाघमारे, व्ही़ व्ही़ कुलकर्णी, एस़ एस़ कापडे, एस़ एम़ पंडागळे, जे़ सी़ सुरवसे, ए़ व्ही़ अंधारे, के़ ए़ सरवदे, ए़ एच़ वेदपाठक, एल़ एऩ गरूड, एस़ एस़ काळे, के़ व्ही़ शेख, एम़ ए़ मगर, व्ही़ एस़ पोतदार, बी़ व्ही़ क्षीरसागर, एम़ पी़ कुंभार, आऱ ए़ चांदणे, एस़ जी़ क्षीरसागर आदीनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)