शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

कें द्रीय पुरातत्व विभागाचा अडेलतट्टूपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:55 IST

पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेला असल्याचा आरोप राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केला.

ठळक मुद्देजयकुमार रावल : राज्यातील पर्यटन केंद्रांना पायाभूत सेवा-सुविधा देणार

औरंगाबाद : पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेला असल्याचा आरोप राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केला.पर्यटन विभागाच्या नेतृत्वात औरंगाबादेत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन केले आहे. यासाठी २९ बुद्धिस्ट देशांतील २०० प्रतिनिधी आले आहेत. या प्रतिनिधींमुळे राज्याचे पर्यटन जागतिक स्तरावर पोहोचले आहे. या परिषदेचे भारतात पहिल्यांदाच आयोजन केले जात असून, त्याचा मान महाराष्ट्राला मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील पर्यटनातील अडचणी आणि उपाययोजना विषयी प्रसारमाध्यमांशी जयकुमार रावल बोलत होते. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी पायाभूत सुविधा, पर्यटकांना आकर्षित केले जाईल, असे उपक्रम राबवता येऊ शकातात. त्या ठिकाणी हा विभाग सोयी-सुविधा पुरवत नाही. त्या पुरविण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. मात्र, त्यासाठी परवानगीही देण्यात येत नाही. अनेक योजना अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पडून आहेत. त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेही रावल यांनी स्पष्ट केले. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यात पर्यटकांसाठी लागणाºया अत्यावश्यक सेवा-सुविधापासून प्रत्येक गोष्टीचा साकल्याने विचार करीत आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही. याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे, औरंगाबाद ते जळगाव, चंद्रपूर, लोणार, सिंधुदुर्ग या ठिकाणांना कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकाच ठिकाणाहून राज्यातील प्रत्येक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जाण्यासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, तिकीट, निवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एकाच ठिकाणाहून सर्व काहीपर्यटन विभाग पर्यटकांना एकाच ठिकाणाहून राज्यातील कोणत्याही पर्यटनस्थळाच्या ठिकाणची निवास व्यवस्था, वाहतूक, तिकीट आणि दिवसभर वास्तू पाहिल्यानंतर सायंकाळी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देईल. यामुळे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्या भागातील नागरिकांना महाराष्ट्रातील पर्यटनासाठी पाठवून देईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही रावल यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBuddha Cavesबौद्ध लेणीJaykumar Rawalजयकुमार रावल