शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद

By विकास राऊत | Updated: August 8, 2024 14:40 IST

कुलगुरू म्हणतात सरळसेवा भरतीतून मेरीटचे उमेदवार मिळतील

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता आणि विभागप्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्याऐवजी सरळ सेवा भरतीने भरण्यावरून चार कुलगुरू आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात मतभेद असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सूचना करूनही कुलगुरूंनी मंत्र्यांना दाद न दिल्याने कृषिमंत्री मुंडे यांनी पदोन्नतीच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आबीटकर यांना बुधवारी पत्र दिले.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि सहयोगी अधिष्ठातांच्या पदोन्नतीबाबत निवड समितीच्या दोन बैठका कृषिमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली २९ व ३० जुलै दरम्यान झाल्या. त्यात केवळ प्राध्यापक पदांचा विचार झाला. परंतु विभागप्रमुख आणि सहयोगी अधिष्ठातांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव कृषी परिषदेने मान्यतेसाठी ठेवूनही त्यावर कार्यवाही झाली नाही. तो विषय स्थगित ठेवण्यात आला.

सोशल मीडियातून टीकाकृषी विद्यापीठामध्ये सहयोगी अधिष्ठाता व विभागप्रमुख ही पदे ५० टक्के पदोन्नती व ५० टक्के सरळसेवा भरतीने भरावीत, असा शासनाचा नियम आहे. आता जी पदे भरायची आहेत, ते मागासवर्गीय आहेत. त्यामुळे ही पदे पदोन्नतीने भरण्याऐवजी पदे सरळ सेवा भरतीने भरण्यासाठी कुलगुरू एकवटल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे.

चार विद्यापीठांत सुमारे १०० प्रकरणेडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या विद्यापीठांत सुमारे १०० पदोन्नतीचे प्रस्ताव आहेत. ही सगळी पदे मागासवर्गीय असल्याची चर्चा आहे. सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याचे मीम्स सोशल मीडियातून येत असल्यामुळे कृषिमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत, सेवा प्रवेश मंडळाच्या अध्यक्षांना पत्र देऊन लवकर निर्णय घेण्याची सूचना केली आहे.

तातडीने निर्णय घेण्यासाठी मुंडे यांचे पत्रपदोन्नती रखडल्यामुळे विद्यापीठातील वरिष्ठांवर अन्याय होत असल्याचा संदेश जातो आहे. अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोशल मीडियात कृषी विद्यापीठांबाबत नकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे पदोन्नतीबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा.-धनंजय मुंडे, कृषी मंत्री( ७ ऑगस्ट २०२४ रोजी अध्यक्षांना दिलेले पत्र )

सरळसेवा भरतीतून मेरिटचे शास्त्रज्ञ मिळतीलपदोन्नती ऐवजी सरळसेवा भरती केली तर मेरिटचे शास्त्रज्ञ मिळतील. पूर्ण देशात ही पदे सरळसेवा भरतीने भरली जातात. इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये हाच नियम आहे. मेरिट हवे असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील. मंत्र्यांची जी भावना आहे, त्याबाबत सेवा प्रवेश मंडळ बैठक घेऊन चर्चा करेल. महाराष्ट्राचे शास्त्रज्ञ राष्ट्रीय पातळीवर जावेत, त्यासाठी मेरिटवर चांगले उमेदवार येतील, अशी माझी भावना आहे. देशात या पदांवर पदोन्नती होत नाही. स्पर्धात्मक निवड राज्यात व्हावी ही अपेक्षा आहे. सेवा मंडळाचे अध्यक्ष आबीटकर यांची समिती यावर निर्णय घेईल.-डॉ. इंद्रमणी, कुलगुरू, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAurangabadऔरंगाबादVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठState Governmentराज्य सरकार