शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठातील पदोन्नतीवरून कृषिमंत्री आणि चारही कुलगुरूंमध्ये मतभेद

By विकास राऊत | Updated: August 8, 2024 14:40 IST

कुलगुरू म्हणतात सरळसेवा भरतीतून मेरीटचे उमेदवार मिळतील

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता आणि विभागप्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्याऐवजी सरळ सेवा भरतीने भरण्यावरून चार कुलगुरू आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात मतभेद असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सूचना करूनही कुलगुरूंनी मंत्र्यांना दाद न दिल्याने कृषिमंत्री मुंडे यांनी पदोन्नतीच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आबीटकर यांना बुधवारी पत्र दिले.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि सहयोगी अधिष्ठातांच्या पदोन्नतीबाबत निवड समितीच्या दोन बैठका कृषिमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली २९ व ३० जुलै दरम्यान झाल्या. त्यात केवळ प्राध्यापक पदांचा विचार झाला. परंतु विभागप्रमुख आणि सहयोगी अधिष्ठातांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव कृषी परिषदेने मान्यतेसाठी ठेवूनही त्यावर कार्यवाही झाली नाही. तो विषय स्थगित ठेवण्यात आला.

सोशल मीडियातून टीकाकृषी विद्यापीठामध्ये सहयोगी अधिष्ठाता व विभागप्रमुख ही पदे ५० टक्के पदोन्नती व ५० टक्के सरळसेवा भरतीने भरावीत, असा शासनाचा नियम आहे. आता जी पदे भरायची आहेत, ते मागासवर्गीय आहेत. त्यामुळे ही पदे पदोन्नतीने भरण्याऐवजी पदे सरळ सेवा भरतीने भरण्यासाठी कुलगुरू एकवटल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे.

चार विद्यापीठांत सुमारे १०० प्रकरणेडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या विद्यापीठांत सुमारे १०० पदोन्नतीचे प्रस्ताव आहेत. ही सगळी पदे मागासवर्गीय असल्याची चर्चा आहे. सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याचे मीम्स सोशल मीडियातून येत असल्यामुळे कृषिमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत, सेवा प्रवेश मंडळाच्या अध्यक्षांना पत्र देऊन लवकर निर्णय घेण्याची सूचना केली आहे.

तातडीने निर्णय घेण्यासाठी मुंडे यांचे पत्रपदोन्नती रखडल्यामुळे विद्यापीठातील वरिष्ठांवर अन्याय होत असल्याचा संदेश जातो आहे. अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सोशल मीडियात कृषी विद्यापीठांबाबत नकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे पदोन्नतीबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा.-धनंजय मुंडे, कृषी मंत्री( ७ ऑगस्ट २०२४ रोजी अध्यक्षांना दिलेले पत्र )

सरळसेवा भरतीतून मेरिटचे शास्त्रज्ञ मिळतीलपदोन्नती ऐवजी सरळसेवा भरती केली तर मेरिटचे शास्त्रज्ञ मिळतील. पूर्ण देशात ही पदे सरळसेवा भरतीने भरली जातात. इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये हाच नियम आहे. मेरिट हवे असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील. मंत्र्यांची जी भावना आहे, त्याबाबत सेवा प्रवेश मंडळ बैठक घेऊन चर्चा करेल. महाराष्ट्राचे शास्त्रज्ञ राष्ट्रीय पातळीवर जावेत, त्यासाठी मेरिटवर चांगले उमेदवार येतील, अशी माझी भावना आहे. देशात या पदांवर पदोन्नती होत नाही. स्पर्धात्मक निवड राज्यात व्हावी ही अपेक्षा आहे. सेवा मंडळाचे अध्यक्ष आबीटकर यांची समिती यावर निर्णय घेईल.-डॉ. इंद्रमणी, कुलगुरू, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAurangabadऔरंगाबादVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठState Governmentराज्य सरकार