शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ही महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:38 PM

अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, प्राचीन दरवाजे अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेली औरंगाबाद नगरी पर्यटनाच्या बाबतीत थेट जगाच्या नकाशावर आलेली आहे; परंतु काळानुसार स्वत:मध्ये बदल करीत पर्यटक ांच्या अपेक्षेनुसार या शहरात काही भौतिक सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेंन्स’ वाढणेही आवश्यक असल्याचे मत पर्यटन व्यावसायिकांनी तसेच शहरातील पर्यटनप्रेमींनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.

ठळक मुद्देजागतिक पर्यटन दिन : पर्यटकांच्या गरजेनुसार शहरात भौतिक सुधारणा आवश्यक

रुचिका पालोदकरऔरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, प्राचीन दरवाजे अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेली औरंगाबाद नगरी पर्यटनाच्या बाबतीत थेट जगाच्या नकाशावर आलेली आहे; परंतु काळानुसार स्वत:मध्ये बदल करीत पर्यटक ांच्या अपेक्षेनुसार या शहरात काही भौतिक सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेंन्स’ वाढणेही आवश्यक असल्याचे मत पर्यटन व्यावसायिकांनी तसेच शहरातील पर्यटनप्रेमींनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.सध्या अनेक व्यवसाय हे आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. आजच्या तरुणांपर्यंत आणि जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीपर्यंत क्षणार्धात पोहोचायचे असेल, तर आपला किंवा आपल्या उद्योगाचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ असणे अत्यंत आवश्यक आहे. भरघोस उत्पन्न आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाºया पर्यटन व्यवसायानेही डिजिटल युगाची पावले ओळखत कात टाकणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच २०१८ च्या पर्यटन दिनासाठी खास ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.जागतिक ख्यातीची पर्यटनस्थळे शहरात असूनही या स्थळांचा डिजिटल माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्यात पर्यटन मंडळ कमी पडत असल्याचे दिसून येते. या मंडळाचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ केवळ नावालाच असून ‘अपडेट’ राहणे आणि पर्यटन स्थळांचे ‘डिजिटल मार्के टिंग’ करून अधिकाधिक पर्यटक ांना शहराकडे आकर्षित करण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मागे पडते आहे. एमटीडीसीची वेबसाईट पुस्तकी स्वरूपातील असून, त्यावर पर्यटन स्थळांची सर्व माहिती उपलब्ध तर आहे. मात्र, सध्याच्या काळानुसार पर्यटनस्थळी असणारे तिकिटांचे दर, तिकि टांचे आॅनलाईन बुकिंग या सर्व सुविधांचा येथे अभाव आहे. येथील दूरध्वनी क्रमांकही जुने असून ते बदलणेही आवश्यक आहे. या गोष्टीमुळे पर्यटक इतर संकेतस्थळांना भेटी देतात. प्रत्येक संकेत स्थळावर वेगवेगळी माहिती उपलब्ध असल्यामुळे कोणती माहिती ग्राह्य धरावी, याबाबत पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे अभ्यासपूर्ण लेखन (ब्लॉग), पर्यटन स्थळांसंबंधीचे वृत्त, या क्षेत्रात होणारे बदल या सर्व गोष्टी वारंवार संकेतस्थळावर टाकाव्यात, तसेच फे सबुक पेज, टिष्ट्वटर या माध्यमातूनही पर्यटन स्थळांचा अधिकाधिक प्रचार करावा, असे काही बदल पर्यटनप्रेमींनी सुचविले.चौकट :- परदेशी पर्यटकांनी दिवसभर पर्यटन केल्यानंतर त्यांना सायंकाळच्या वेळी त्यांच्या पद्धतीनुसार मनोरंजनासाठी शहरात काही सुविधा उपलब्ध असणेही बदलत्या काळानुसार गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या लोककलांविषयी माहिती देणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण, नाईट क्लब, खास परदेशी नागरिकांच्या पद्धतीनुसार उभी करण्यात आलेली रेस्टॉरंटस् या सर्व गोष्टी शहरात सुरू झाल्यास त्याचा पर्यटनावर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.- पर्यटकांच्या दृष्टीने शहरात उत्कृष्ट बाजारपेठ निर्माण होणेही आवश्यक आहे. याच धर्तीवर अवाढव्य खर्च करून कलाग्रामचा पांढरा हत्ती उभारण्यात आला; परंतु चुकीची जागा निवडल्यामुळे आणि अन्य काही कारणांमुळे थोड्या दिवसात तेथील ‘कला’ लोप पावली असून केवळ ‘ग्राम’ उरले आहे.चौकट :रस्ते आणि कचरा हे मुख्य अडसर-डिजिटल प्रेझेन्ससोबतच शहरात भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील रस्ते आणि कचरा या दोन गोष्टी प्रामुख्याने अडसर ठरत आहेत. रस्ते दुरुस्ती हे प्रशासनाचे काम असले तरी कचºयासाठी मात्र सामान्य नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. परदेशी नागरिकांना आपल्या शहरात स्वच्छ वाटावे म्हणून मनपाच्या बरोबरीने नागरिकांनी प्रयत्न केल्यास ही एक मोठी देशसेवा होईल.- जसवंतसिंगसहल आयोजक

टॅग्स :Aurangabad caveऔरंगाबाद लेणीtourismपर्यटन