शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

डिझेलचा टँकर पलटी, गावकऱ्यांची ड्रम अन् टिपाडसह अपघातस्थळी धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 16:45 IST

औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ एक डिझेलचा टँकर पलटी झाला. टँकर पलटी झाल्याचं गावात समजताच, गावकऱ्यांनी हातात जे मिळेल ते घेऊन टँकरकडे धाव घेतली.

ठळक मुद्देदेशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर, डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल आहे. त्यामुळेच, डिझेलच्या टँकरला अपघात झाल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली

औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळे गावानजीक एका ई कॉमर्स कंपनीचा माल घेऊन औरंगाबादमार्गे दिल्लीकडे निघालेल्या कंटेनरला अपघात झाला होता. त्यावेळी, स्थानिकांनी कंटेनरमधील वस्तू घरी नेण्यासाठी तोबा गर्दी केली होती. त्यानंतर, आता औरंगाबादजवळ एका डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला. त्यावेळी, स्थानिकांनी डिझेल घरी नेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, नागरिकांना रोखले. 

औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ एक डिझेलचा टँकर पलटी झाला. टँकर पलटी झाल्याचं गावात समजताच, गावकऱ्यांनी हातात जे मिळेल ते घेऊन टँकरकडे धाव घेतली. त्यानंतर, डिझेल पळवण्याचा खेळ सुरू झाला. विशेष म्हणजे एका पठ्ठ्याने 200 लिटरचं टिपाड घेऊन डिझेल नेण्याची तयारी केली होती. मात्र, बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरल्यामुळे पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, लोकांना डिझेल चोरी करण्यापासून अडविण्यात आले. 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर, डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल आहे. त्यामुळेच, डिझेलच्या टँकरला अपघात झाल्याचे समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मिळेल त्या भांड्यात डिझेल पळविण्याची जणू स्पर्धाच लागली होती. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर हायवेवर डिझेलने भरलेला टँकर जालना जिल्ह्याकडे जात होता. त्यावेळी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ डिझेलने भरलेला टँकर रस्त्याच्या खाली जात काटेरी झुडपात पलटी झाला. यात गाडीचा क्लिनर जखमी झाला. ड्रायव्हरलाही थोडासा मार लागला.

उस्मानाबादमध्येही कंटेनर पलटी

या आठवड्यातच एका ई कॉमर्स कंपनीचा माल घेऊन एक कंटेनर बेंगळुरुहून दिल्लीकडे निघाला होता. त्यामध्ये जवळपास ७५ लाख रुपयांचा माल होता. सोलापूर-धुळे मार्गावरुन तो औरंगाबादमार्गे पुढे मार्गस्थ होणार होता. तत्पूर्वीच सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास तेरखेडा (जि.उस्मानाबाद) गावानजिक येताच हा कंटेनर रस्त्याशेजारी उलटला. पेढीवरील लोकांना या अपघाताची माहिती कळताच तेथील सुमारे दीडशेवर लोकांनी याठिकाणी धावा बोलला. कंटेनरमधील माल लुटण्यास सुरुवात केली. ही बाब येरमाळा पोलिसांना कळताच पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक पथक घटनास्थळी दाखल झाले अन् माल हस्तगत केला.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAccidentअपघात