शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

बळीराजाच्या मुलाचा निर्धार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३६ जिल्ह्यांतून काढली सायकल फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 4:04 PM

शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद : शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाची किंमत ठरवू द्या, शासनाने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित मदत द्या, शेतकरी कर्जमुक्त करा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाळासाहेब बाबूराव कोळसे (रा. आडगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हा युवा शेतकरी ३६ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यासाठी सायकलने प्रवास करीत मंगळवारी औरंगाबादेत पोहोचला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तो पुढील प्रवासाला रवाना झाला.

शेतकरी कर्ज काढून शेती करतात; मात्र पिकविलेल्या पिकांना बाजारात भाव मिळत नाही. यात तो कर्जबाजारी होऊन खचून जातो आणि आत्महत्येकडे वळतो. या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव ठरविण्याचे अधिकार असावेत, राज्य शासनाची सर्व नोकरभरती एमपीएससीमार्फत करावी आदी मागण्यांसाठी बाळासाहेब काेळसे यांनी त्यांच्या गावातून १३ ऑक्टोबरपासून सायकलने प्रवास सुरू केला. आतापर्यंत १७ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी निवेदने दिली. त्यांनी मंगळवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. 

शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढील प्रवासात आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देणार आहे. शेवटी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना भेटून शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद