शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

मागेल त्याला शेततळे घोषणा विसंगत

By admin | Updated: April 17, 2016 01:31 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे, अशी घोषणा केली. मराठवाड्यात २५ हजार तर औरंगाबाद जिल्ह्यात २४१७ शेततळ्यांना मंजुरी देण्यात येणार आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे, अशी घोषणा केली. मराठवाड्यात २५ हजार तर औरंगाबाद जिल्ह्यात २४१७ शेततळ्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १० हजार अर्ज आलेले असताना २४१७ लाभधारक होत असतील, तर मागेल त्याला शेततळे ही घोषणाच कुठे तरी विसंगत असल्याचे मत पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत व्यक्त केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची बैठकीला उपस्थिती होती. टप्प्याटप्प्याने सर्वांना शेततळी देण्यात येतील, अशी सारवासारव करून बागडे यांनी बैठक दुसऱ्या विषयाकडे नेली. तर पालकमंत्री कदम पत्रकारांशी बोलताना म्हणाले, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच येत्या कॅबिनेटमध्येदेखील योजनेप्रकरणी उद्दिष्ट ठेवण्याऐवजी प्रत्येक अर्जाचा विचार करावा, असा मुद्दा मांडण्यात येईल. बैठकीत कृषी अधिकारी रमाकांत पडवळ यांनी जिल्ह्यातील शेततळ्यांचे अर्ज आणि उद्दिष्टांची माहिती दिली. त्यावर पालकमंत्री म्हणाले, जर मुख्यमंत्र्यांनी मागेल त्याला शेततळे अशी घोषणा केली आहे, तर मग उद्दिष्ट आले कुठून, असा सवाल कदम यांनी केला. कृषी अधिकारी पडवळ उत्तर देताना म्हणाले, दारिद्र्यरेषेखालील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, आॅनलाईन अर्जानुसार प्राधान्याने लाभार्थी निवडण्यात येतील. जास्त अर्ज आल्यामुळे उद्दिष्ट ठरवावे लागले. यावेळी बागडे म्हणाले, आॅनलाईन अर्जांमध्ये जुने लाभार्थी आहेत काय, नसतील तर टप्प्याटप्प्यांनी लाभार्थी निवडावेत.