शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

दिंड्यांना सहकार्य नाकारल्यामुळे वाद चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:03 AM

आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपूरकडे जिल्ह्यातून ४५ दिंड्या प्रस्थान करीत असतात. जिल्हा परिषदेमार्फत दिंड्यांतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा व पाण्याच्या टँकरचा पुरवठा केला जात असतो. मात्र, यंदा यासाठी जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात तरतूद केली नसल्यामुळे पदाधिकारी विरुद्ध प्रशासन अशा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : आषाढी एकादशीसाठी जातात जिल्ह्यातून ४५ दिंड्या

औरंगाबाद : आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपूरकडे जिल्ह्यातून ४५ दिंड्या प्रस्थान करीत असतात. जिल्हा परिषदेमार्फत दिंड्यांतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा व पाण्याच्या टँकरचा पुरवठा केला जात असतो. मात्र, यंदा यासाठी जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात तरतूद केली नसल्यामुळे पदाधिकारी विरुद्ध प्रशासन अशा नव्या वादाला तोंड फुटले आहे.यासंदर्भात जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर व अर्थ तथा बांधकाम समितीचे सभापती विलास भुमरे यांनी सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांना जाब विचारला. उद्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना याबाबत विचारणा केली जाणार असल्याचे या दोघांनी सांगितले. दिंड्यांतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेची एक रुग्णवाहिका, एक डॉक्टर, औषधांचा पुरवठा केला जातो, तर पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याचे टँकर दिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या लेखाशीर्षमध्ये प्रत्येकी १० ते १५ लाखांची तरतूद केली जाते.सभापती विलास भुमरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तयार केला. मागील वर्षी आम्ही अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हा अर्थसंकल्पात दिंड्यांसाठी वाढीव तरतूद करण्यात आली होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पात दिंड्यांना सहकार्य करण्यासाठी प्रशासनाने उदासीन भूमिका घेतली. आरोग्य पथक व पाण्याच्या टँकरसाठी तरतूद न केल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाप्रती सदस्य, पदाधिकारी व वारकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. दिंड्यांना देण्यात येणाºया सुविधांसाठी तरतूद करण्यात येणाºया निधीला प्रशासनाने यंदा जाणीवपूर्वक कात्री लावली, असा आरोप भुमरे यांनी केला आहे.चौकट ....तात्काळ निधीतून दहा लाखांची तरतूदयासंदर्भात आरोग्य सभापती मीना शेळके यांनी सांगितले की, जिल्ह्यातून जाणाºया दिंड्यांसाठी यंदा अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातून दरवर्षी ४० ते ४५ दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतात. दिंड्यांतील वारकºयांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी आरोग्य सुविधांसाठी अति तात्काळ निधीतून १० लाखांची तरतूद करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे यंदाही दिंड्यांसोबत आरोग्य पथक रवाना होईल.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक