शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

ताम्हण- पळीच्या नादात ब्राह्मण समाज संघर्ष समितीने मांडल्या मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:24 PM

जय परशूराम असे लिहिलेल्या केशरी रंगाच्या टोप्या, पिवळ्या आणि केशरी रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या महिला आणि कद किंवा धोतर अशी ब्राह्मणांची पारंपरिक वेशभुषा करून आलेले पुरूष हे या आंदोलनाचे वेगळेपण ठरले.

ठळक मुद्दे१ जानेवारीपासून अशा प्रकारचे आंदोलन मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेमराठवाड्यातील आंदोलनाचा समारोप शुक्रवारी औरंगाबाद येथे झाला. अशाच प्रकारचे आंदोलन आता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र येथेही करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : 'आम्ही ब्राह्मण वाजवतो पळी ताम्हण, आमचं मागणं मांडतो शांततेनं...' असे म्हणत आणि ताम्हण- पळीचा आवाज करत ब्राह्मण समाजाने आपल्या मागण्या पुन्हा एकदा शासन दरबारी मांडल्या. ब्राह्मण समाज संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्तालयासमोर करण्यात आलेले ताम्हण-पळी बजाओ आंदोलन लक्षवेधी ठरले. 

जय परशूराम असे लिहिलेल्या केशरी रंगाच्या टोप्या, पिवळ्या आणि केशरी रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या महिला आणि कद किंवा धोतर अशी ब्राह्मणांची पारंपरिक वेशभुषा करून आलेले पुरूष हे या आंदोलनाचे वेगळेपण ठरले. ताम्हण आणि पळी ही खास ब्राह्मण समाजाची प्रतिके म्हणून ओळखली जातात. त्यामुळे आंदोलन करण्यासाठी या दोन प्रतिकांची निवड करण्यात आली होती. ब्राह्मण समाजाच्या माफक आणि न्याय मागण्यांसाठी समाजाच्यावतीने अनेक वर्षांपासून लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. परंतू याकडे शासन सर्रास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता तरी शासनाने जागे होऊन समाजाच्या मागण्या मान्य कराव्या, अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली होती.

१ जानेवारीपासून अशा प्रकारचे आंदोलन मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आले असून मराठवाड्यातील आंदोलनाचा समारोप शुक्रवारी औरंगाबाद येथे झाला. अशाच प्रकारचे आंदोलन आता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र येथेही करण्यात येणार आहे. आता जर शासनाने मागण्यांसंदर्भात ठोस भूमिका घेतली नाही, तर यानंतरचे आंदोलन अधिक तिव्र असेल, असा इशाराही समितीने दिला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, विजया रहाटकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. समितीचे समन्वयक दिपक रणनवरे, प्रमोद पुसरेकर, धनंजय कुलकर्णी, विजया अवस्थी, संगीता शर्मा, विजया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले. आदिशक्ती भजनी मंडळाच्या महिलांनी केलेले भारूड लक्षवेधी ठरले.

या मागण्यांसाठी आंदोलन :- समाजाचे आर्थिक सर्व्हेक्षण व्हावे.- तरूणांना शैक्षणिक, व्यावसायिक तसेच वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळास १ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी.- प्रत्येक जिल्ह्यात मुला- मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करावे.- केजी टू पीजी शिक्षण मोफत करावे.- ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अथवा तत्सम कायदा करून कारवाई व्हावी.- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.- पुरोहित समाजाला मासिक ५ हजार रूपये मानधन द्यावे.- ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्या.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय