शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

औरंगाबादेत पाण्याची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:23 IST

उन्हाळ्याला सुरुवात होताच सातारा-देवळाई परिसरात पाण्याची मागणी वाढली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने व टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

ठळक मुद्देसातारा-देवळाई : बोअरही आटले; नागरिकांची भटकंती आता सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उन्हाळ्याला सुरुवात होताच सातारा-देवळाई परिसरात पाण्याची मागणी वाढली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने व टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी सभोवतालच्या परिसरात नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.सातारा-देवळाई भागाचा महापालिकेत समावेश होऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, अजूनही या भागात महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. उलट प्रशासनाकडून नागरिकांच्या मजबुरीचा फायदा घेऊन वाढीव दराने पाणी विक्री केली जात आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने बोअरवेल, हातपंप व विहिरीची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे विविध सोसायटी, कॉलनीत पाण्याची मागणी वाढली आहे. आठवडाभरात पाण्याच्या टँकरसाठी मनपा वॉर्ड कार्यालयात अनेकांनी अर्ज दिले आहेत; पण प्रशासनाकडून पाण्याच्या मागणीची अद्याप पूर्तता केलेली नाही. जलसाठ्याच्या पाणीपातळीत झालेली घट आणि प्रशासनाकडून पाणी देण्यास केली जाणारी टाळाटाळ यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना खाजगी टँकरचे पाणी घ्यावे लागत आहे. विकतचे पाणी परवड नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना सभोवतालच्या परिसरातील खाजगी विहिरी, बोअरवेलवरून पायपीट करीत डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.खासगी टँकरला सुगीचे दिवससातारा-देवळाई परिसरात पाणीटंचाईमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. मनपाचे पाणी दर परवडत नसल्याने बहुतांशी नागरिक खाजगी टँकरद्वारे पाणी घेत आहेत. या भागात टँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महापालिकेला सर्व ठिकाणी पाणी देणे अशक्य आहे. पाण्याची गरज ओळखून अनेकांनी पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पाणीटंचाई पाहता खाजगी टँकरला सुगीचे दिवस आले आहेत.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादSatara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका