शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

औरंगाबादेत पाण्याची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:23 IST

उन्हाळ्याला सुरुवात होताच सातारा-देवळाई परिसरात पाण्याची मागणी वाढली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने व टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

ठळक मुद्देसातारा-देवळाई : बोअरही आटले; नागरिकांची भटकंती आता सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उन्हाळ्याला सुरुवात होताच सातारा-देवळाई परिसरात पाण्याची मागणी वाढली आहे. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने व टँकरद्वारे मिळणारे पाणी पुरत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी सभोवतालच्या परिसरात नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.सातारा-देवळाई भागाचा महापालिकेत समावेश होऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, अजूनही या भागात महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. उलट प्रशासनाकडून नागरिकांच्या मजबुरीचा फायदा घेऊन वाढीव दराने पाणी विक्री केली जात आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने बोअरवेल, हातपंप व विहिरीची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे विविध सोसायटी, कॉलनीत पाण्याची मागणी वाढली आहे. आठवडाभरात पाण्याच्या टँकरसाठी मनपा वॉर्ड कार्यालयात अनेकांनी अर्ज दिले आहेत; पण प्रशासनाकडून पाण्याच्या मागणीची अद्याप पूर्तता केलेली नाही. जलसाठ्याच्या पाणीपातळीत झालेली घट आणि प्रशासनाकडून पाणी देण्यास केली जाणारी टाळाटाळ यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना खाजगी टँकरचे पाणी घ्यावे लागत आहे. विकतचे पाणी परवड नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना सभोवतालच्या परिसरातील खाजगी विहिरी, बोअरवेलवरून पायपीट करीत डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.खासगी टँकरला सुगीचे दिवससातारा-देवळाई परिसरात पाणीटंचाईमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. मनपाचे पाणी दर परवडत नसल्याने बहुतांशी नागरिक खाजगी टँकरद्वारे पाणी घेत आहेत. या भागात टँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महापालिकेला सर्व ठिकाणी पाणी देणे अशक्य आहे. पाण्याची गरज ओळखून अनेकांनी पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पाणीटंचाई पाहता खाजगी टँकरला सुगीचे दिवस आले आहेत.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादSatara areaसातारा परिसरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका