शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मनपा वॉर्ड कार्यालयांत खेटे; कुठे आठ, तर कुठे पंधरा दिवसांची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:30 IST

राजकीय ओळख अथवा अर्जासोबत ‘वजन’ ठेवल्यास लवकर काम होते, असे रांगेत उभे असलेल्या अनेक नागरिकांनी नमूद केले.

ठळक मुद्देप्रशासनही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत करताना दिसून येत नाही.महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमलेले नाहीत.

औरंगाबाद : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मनपाच्या वाॅर्ड कार्यालयांकडून मिळविण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर कुठे आठ दिवस, तर कुठे पंधरा दिवस वेटिंग आहे. झटपट प्रमाणपत्र हवे असल्यास अर्जावर ‘वजन’ ठेवावे लागते. मात्र, या गंभीर प्रकाराकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. प्रशासनही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत करताना दिसून येत नाही.

मनपाच्या ९ झोन कार्यालयांमध्ये जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्याची सुविधा आहे. सर्वाधिक जन्म-मृत्यू प्रमाणपत्र महापालिका मुख्यालयातील झोन क्रमांक १ मध्ये देण्यात येतात. अर्ज दाखल केल्यानंतर किमान दहा ते पंधरा दिवस नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. राजकीय ओळख अथवा अर्जासोबत ‘वजन’ ठेवल्यास लवकर काम होते, असे रांगेत उभे असलेल्या अनेक नागरिकांनी नमूद केले. झोन क्रमांक २ म्हणजेच जुना मोंढा आणि झोन क्रमांक ३ येथील परिस्थिती वेगळी नाही. 

जन्म प्रमाणपत्रात स्पेलिंगची चूकमहापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमलेले नाहीत. अनेक जन्म प्रमाणपत्रात इंग्रजीच्या स्पेलिंगमध्ये चूक करून ठेवण्यात येते. पालकांनी वेळीच चूक निदर्शनास आणून दिल्यास ती दुरुस्त करण्यासाठी आणखी पंधरा दिवस वेळ लागतो. ज्या कर्मचाऱ्यांना इंग्रजीचे अजिबात ज्ञान नाही त्यांना या कामावर बसविण्यात आले आहे. अर्जात अचूक स्पेलिंग लिहिलेले असतानाही मूळ प्रमाणपत्रात चुका असतात.

प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अवघडघाटी रुग्णालयात एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला असल्यास त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे अजून आले नाही म्हणून किमान दोन महिने नागरिकांना महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतरही सहजासहजी प्रमाणपत्र मिळत नाही.  

प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी कार्यालयात आलोयसकाळपासून झोन क्रमांक एकमधील कार्यालयात येऊन बसलो आहे. जुन्या जन्म प्रमाणपत्रात दुरुस्ती करून हवी आहे. आजच अर्ज दाखल केला आहे. जुने रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरू आहे, असे सांगतात. प्रमाणपत्र दुरुस्त करून कधी मिळेल माहीत नाही.- शेख जमीर,नागरिक.

दुरुस्तीच्या जुन्या प्रकरणांमुळे वेळ लागतोअनेक नागरिक पंधरा ते वीस वर्षांनंतर जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. पासपोर्ट काढताना अथवा उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचे असेल, तर जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती करण्यासाठी येतात. जुने रेकॉर्ड काढून बघण्यासाठी वेळ लागतो. वाॅर्ड कार्यालयांमध्ये कामाचा व्याप प्रचंड आहे.- नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका