शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मनपा वॉर्ड कार्यालयांत खेटे; कुठे आठ, तर कुठे पंधरा दिवसांची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:30 IST

राजकीय ओळख अथवा अर्जासोबत ‘वजन’ ठेवल्यास लवकर काम होते, असे रांगेत उभे असलेल्या अनेक नागरिकांनी नमूद केले.

ठळक मुद्देप्रशासनही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत करताना दिसून येत नाही.महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमलेले नाहीत.

औरंगाबाद : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मनपाच्या वाॅर्ड कार्यालयांकडून मिळविण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज दाखल केल्यानंतर कुठे आठ दिवस, तर कुठे पंधरा दिवस वेटिंग आहे. झटपट प्रमाणपत्र हवे असल्यास अर्जावर ‘वजन’ ठेवावे लागते. मात्र, या गंभीर प्रकाराकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही. प्रशासनही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न करीत करताना दिसून येत नाही.

मनपाच्या ९ झोन कार्यालयांमध्ये जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देण्याची सुविधा आहे. सर्वाधिक जन्म-मृत्यू प्रमाणपत्र महापालिका मुख्यालयातील झोन क्रमांक १ मध्ये देण्यात येतात. अर्ज दाखल केल्यानंतर किमान दहा ते पंधरा दिवस नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. राजकीय ओळख अथवा अर्जासोबत ‘वजन’ ठेवल्यास लवकर काम होते, असे रांगेत उभे असलेल्या अनेक नागरिकांनी नमूद केले. झोन क्रमांक २ म्हणजेच जुना मोंढा आणि झोन क्रमांक ३ येथील परिस्थिती वेगळी नाही. 

जन्म प्रमाणपत्रात स्पेलिंगची चूकमहापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी नेमलेले नाहीत. अनेक जन्म प्रमाणपत्रात इंग्रजीच्या स्पेलिंगमध्ये चूक करून ठेवण्यात येते. पालकांनी वेळीच चूक निदर्शनास आणून दिल्यास ती दुरुस्त करण्यासाठी आणखी पंधरा दिवस वेळ लागतो. ज्या कर्मचाऱ्यांना इंग्रजीचे अजिबात ज्ञान नाही त्यांना या कामावर बसविण्यात आले आहे. अर्जात अचूक स्पेलिंग लिहिलेले असतानाही मूळ प्रमाणपत्रात चुका असतात.

प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अवघडघाटी रुग्णालयात एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला असल्यास त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे अजून आले नाही म्हणून किमान दोन महिने नागरिकांना महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतरही सहजासहजी प्रमाणपत्र मिळत नाही.  

प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी कार्यालयात आलोयसकाळपासून झोन क्रमांक एकमधील कार्यालयात येऊन बसलो आहे. जुन्या जन्म प्रमाणपत्रात दुरुस्ती करून हवी आहे. आजच अर्ज दाखल केला आहे. जुने रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरू आहे, असे सांगतात. प्रमाणपत्र दुरुस्त करून कधी मिळेल माहीत नाही.- शेख जमीर,नागरिक.

दुरुस्तीच्या जुन्या प्रकरणांमुळे वेळ लागतोअनेक नागरिक पंधरा ते वीस वर्षांनंतर जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. पासपोर्ट काढताना अथवा उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचे असेल, तर जन्म प्रमाणपत्र दुरुस्ती करण्यासाठी येतात. जुने रेकॉर्ड काढून बघण्यासाठी वेळ लागतो. वाॅर्ड कार्यालयांमध्ये कामाचा व्याप प्रचंड आहे.- नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका