जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई
By Admin | Updated: January 21, 2015 23:54 IST2015-01-21T00:57:58+5:302015-01-21T23:54:15+5:30
लातूर : जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, अधिग्रहण व उपाययोजना करण्याची मागणी गावा-गावांतून होत आहे. परिणामी,

जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई
लातूर : जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, अधिग्रहण व उपाययोजना करण्याची मागणी गावा-गावांतून होत आहे. परिणामी, ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण कक्षाकडे अधिग्रहणासाठी दररोज प्रस्ताव येत आहेत. दिवसेंदिवस या प्रस्तावांचा ओघ वाढत आहे.
जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून २६ गावाम्ांधून ३२ नवीन विंधन विहिरींच्या प्रस्तावाची मागणी आली आहे़मागणीचे आलेले सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत़ जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे़ त्यामुळे विंधन विहिरीची मागणीही दिवसेंंदिवस वाढत आहे़ अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील २ विंधन विहिरीचे तसेच थोडगेवाडी १, थोडगा १, हंगरगा १, बाभळदरा २, सय्यदपूर १, गादगेवाडी १, सोनवणेवाडी १, हंगेवाडी १, चाटेवाडी १ प्रस्ताव आले आहेत़ चाकूर तालुक्यातील जानवळ येथील २, अंबुलगा १, ब्रम्हवाडी १ विंधन विहिरीच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे़ औसा तालुक्यातील मनोहर तांडा येथील १, लोहारा सिंदाळा १, उंबडगा (बु.) २, उंबडगा (खु.) १, गुबाळ १, गांजनखेडा १, वांगी १, जवळगा पोमादेवी २, बेलकुंड २, माळुंब्रा १, लिंंबाळा (दाऊ) १, मंगरूळ १ असे नव्या विंधन विहिरीच्या मागणी प्रस्ताव आले आहेत़ विंधन विहिरीची मागणी आली आहे़ यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या टंचाई विभागाकडे १३ विंधन विहिरीचे प्रस्ताव आले होते़ या १३ विंधन विहरीचे कामे अद्यापही झाले नाहीत़ १३ विंधन विहिरीपैकी केवळ ८ विंधन विहीरीचे काम पूर्ण झाले आहेत़ अद्यापही ५ विंधन विहिरीचे काम सुरूही झाले नाही. पहिल्या प्रस्तावातीलच ५ विंधन विहिरीचे काम सुरूच झाले नाहीत़ यात या नव्या प्रस्तावांचे काय होणार, अशी चर्चा प्रस्ताव दाखल करण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांत चालू होती़ प्रस्ताव दाखल करण्यापासून ते मंजुरी आणि विंधन विहिरी घेण्यासाठी तीन महिने लागत असतील तर पाणी केव्हा मिळणार, असाही प्रश्न आहे. (प्रतिनिधी)