शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विद्यार्थीसंख्येत झाली घट; शाळेने ३२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 19:17 IST

संतप्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी स्वामी विवेकानंद अकादमीच्या व्यवस्थापनाला विचारला जाब

ठळक मुद्देया शाळेतील २१ शिक्षक व ११ कर्मचारी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील  कायम विनाअनुदानित तत्त्वावर आहेत. न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

औरंगाबाद : विद्यार्थीसंख्येतील घट व परिणामी संचमान्यतेसाठी कार्यभार, पद उपलब्ध नसल्याने चिकलठाणा एमआयडीसीतील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या व्यवस्थापनाने तीन महिन्यांचे मूळ वेतन देत ३२ जणांची सेवा समाप्त केली. त्यामुळे या शाळेत चार तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांना पाचारण करून प्रकरण हाताळण्यात आले. 

या शाळेतील २१ शिक्षक व ११ कर्मचारी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील  कायम विनाअनुदानित तत्त्वावर आहेत. तीन वर्षांपासून पटसंख्येत घट झाल्याने उपरोक्त पदांना मान्यता नाही.  त्यामुळे त्यांना  कमी केल्याची मुख्याध्यापकांच्या हस्ताक्षरांतील पत्रे शाळा व्यवस्थापनाने सोमवारी कर्मचाऱ्यांच्या घरी स्पीड पोस्टाने पाठवून दिल्याने मंगळवारी शाळेसमोर गोंधळ झाला.

दाद मागणारव्यवस्थापन स्वत:च मराठी माध्यमाला प्रवेश देत नाही. आम्हाला  हेतुपुरस्सर काढण्यात आले आहे. आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही शिक्षण विभाग, तसेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

हा निर्णय व्यवस्थापनाचा अकॅडमीच्या व्यवस्थापकीय मंडळाने हा निर्णय घेतलेला असून, त्यांनी नोटीसमध्ये सेवासमाप्तीचे कारणही दिलेले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. यात  स्थानिक मंडळाचा यात काय हेतू असू शकतो. - सत्यनारायण जैस्वाल, (व्यवस्थापक, स्वामी विवेकानंद अकॅ डमी)  

अद्याप कोणीही तक्रार घेऊन आले नाही विवेकानंद अकॅडमीत घडलेल्या या प्रकरणाबाबत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, अद्याप शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाबाबत आमच्याकडे मंगळवारपर्यंत तरी तक्रार केली नाही. मात्र, अनेक दिवसांपासून शाळेत वाद सुरू आहे. ही संस्था उच्च न्यायालयाच्या आदेशाचेही पालन करीत नाही. १९९४ पासून ही शाळा सुरू आहे. शाळा अनुदानावर आल्यानंतरदेखील या संस्थेने ते नाकारले. प्रशासन म्हणून आम्ही त्या शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. - डॉ. बी.बी. चव्हाण (माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी)

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद