शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत आज सायंकाळपर्यंत निर्णय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 12:17 IST

Aurangabad Break The Chain : पुण्यात शहरात तर नागपूरमध्ये पूर्ण जिल्ह्यात परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देपाॅझिटिव्हिटी रेटचा विचार करून निर्णय जिल्हाधिकाऱ्यांची पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा

औरंगाबाद : पुणे व नागपूरप्रमाणे रात्री १० वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये हॉटेल्स चालकांना डायनिंग सेवा देण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai ) यांच्याशी चर्चा केली. नागपूर, पुणे आणि औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा पॉॅझिटिव्हिटी दर किती याची तुलना करून औरंगाबादमधील हॉटेल्सची वेळ वाढविण्याचा निर्णय होईल. मुख्य सचिवांशी चर्चा करून पालकमंत्री मंगळवारी सायंकाळपर्यंत औरंगाबादसाठी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, पालकमंत्री देसाई यांच्याशी हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत चर्चा केली आहे. पुण्यात शहरात तर नागपूरमध्ये पूर्ण जिल्ह्यात परवानगी दिली आहे. औरंगाबादचा कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी दर कमी आहे. त्यामुळे येथे वेळ वाढवून मिळणे शक्य होईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यांपासून हॉटेल, परमिट रूम चालकांचे निर्बंधांमुळे कंबरडे मोडले आहे. नाइटलाइफवरील बंधने कायम आहेत. सर्व हॉटेल्समध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत डायनिंगला परवानगी आहे. शनिवार, रविवार फक्त पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी करता येत आहे. हॉटेल्स व्यवसाय रात्री १० वाजेपर्यंत तरी सुरू राहावा, अशी मागणी सुरू आहे.

शहराबाहेर सगळे आलबेलशहरातच हाॅटेल्सवर वेळ आणि डायनिंग सेवा देण्याची बंधने आहेत. शहराबाहेर मात्र सर्व काही सर्रासपणे सुरू असल्याची ओरड नियमित कर भरणारे परमिट रूम चालक करीत आहेत. त्यातच वाइन शॉप्सना कुठलीही बंधने नाहीत, त्यामुळे परमिट रूममधून कुणीही मद्य खरेदी करीत नाही. वाइन शॉपवरून मद्य खरेदी करून अनेक जण शहराबाहेरील ढाब्यांकडे जातात. लाखो रुपयांचे लायसन्स शुल्क भरून जर व्यवसाय करण्याची मुभा नसेल, तर लायसन्स शुल्क माफ करावे, अशी मागणीदेखील परमिट रूम चालक करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई