शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पिकांची नासाडी, डोक्यावर कर्ज..तणावात असलेल्या शेतकऱ्याचा हृद्यविकाराने मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 18:49 IST

शेतीला व चाऱ्याला फटका बसल्याने उत्पन्न मिळणार नाही. यामुळे कर्ज कसे फिटेल आणि मुलीचे लग्न कसे होईल याच्या विवंचनेत ते होते.

सिल्लोड/ भराडी: अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांची नासाडी झाली,  जनावरांसाठी असलेला चारा ही सडून गेला, त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने तणावात असलेल्या एका शेतकऱ्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे घडली. कृष्णा एकनाथ काकडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

तालुक्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. पेरलेला मका व कापूस पिके पूर्णतः उध्वस्त झाले आहेत. पिके तर गेली त्यासोबतच जनावरांसाठीचा चार सुद्धा नष्ट झाला आहे. कृष्णा काकडे हे यामुळे तणावात होते. त्यांच्याकडे 2 गाई व 2 वासरू होते. दूध विकून ते घरचा प्रपंच चालवत होते. मात्र चारा नसल्याने दुध व्यवसायावर परिणाम झाला होता. तसेच त्यांचाकडे खाजगी सावकाराचे 80 हजार रुपये कर्ज होते.

शेतीला व चाऱ्याला फटका बसल्याने उत्पन्न मिळणार नाही. यामुळे कर्ज कसे फिटेल आणि मुलीचे लग्न कसे होईल याच्या विवंचनेत काकडे होते. यातच त्यांना आज सकाळी हृद्य विकाराचा तीव्र झटका आला आणि ते गतप्राण झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आले. शोकाकुल वातावरणात धानोरा येथील शेतवस्तीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी व पिकांची नासाडी यामुळे 10 दिवसात 3 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादRainपाऊस