शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पिकांची नासाडी, डोक्यावर कर्ज..तणावात असलेल्या शेतकऱ्याचा हृद्यविकाराने मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 18:49 IST

शेतीला व चाऱ्याला फटका बसल्याने उत्पन्न मिळणार नाही. यामुळे कर्ज कसे फिटेल आणि मुलीचे लग्न कसे होईल याच्या विवंचनेत ते होते.

सिल्लोड/ भराडी: अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांची नासाडी झाली,  जनावरांसाठी असलेला चारा ही सडून गेला, त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने तणावात असलेल्या एका शेतकऱ्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे घडली. कृष्णा एकनाथ काकडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

तालुक्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. पेरलेला मका व कापूस पिके पूर्णतः उध्वस्त झाले आहेत. पिके तर गेली त्यासोबतच जनावरांसाठीचा चार सुद्धा नष्ट झाला आहे. कृष्णा काकडे हे यामुळे तणावात होते. त्यांच्याकडे 2 गाई व 2 वासरू होते. दूध विकून ते घरचा प्रपंच चालवत होते. मात्र चारा नसल्याने दुध व्यवसायावर परिणाम झाला होता. तसेच त्यांचाकडे खाजगी सावकाराचे 80 हजार रुपये कर्ज होते.

शेतीला व चाऱ्याला फटका बसल्याने उत्पन्न मिळणार नाही. यामुळे कर्ज कसे फिटेल आणि मुलीचे लग्न कसे होईल याच्या विवंचनेत काकडे होते. यातच त्यांना आज सकाळी हृद्य विकाराचा तीव्र झटका आला आणि ते गतप्राण झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आले. शोकाकुल वातावरणात धानोरा येथील शेतवस्तीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी व पिकांची नासाडी यामुळे 10 दिवसात 3 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादRainपाऊस