शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

पिकांची नासाडी, डोक्यावर कर्ज..तणावात असलेल्या शेतकऱ्याचा हृद्यविकाराने मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 18:49 IST

शेतीला व चाऱ्याला फटका बसल्याने उत्पन्न मिळणार नाही. यामुळे कर्ज कसे फिटेल आणि मुलीचे लग्न कसे होईल याच्या विवंचनेत ते होते.

सिल्लोड/ भराडी: अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांची नासाडी झाली,  जनावरांसाठी असलेला चारा ही सडून गेला, त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने तणावात असलेल्या एका शेतकऱ्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे घडली. कृष्णा एकनाथ काकडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

तालुक्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. पेरलेला मका व कापूस पिके पूर्णतः उध्वस्त झाले आहेत. पिके तर गेली त्यासोबतच जनावरांसाठीचा चार सुद्धा नष्ट झाला आहे. कृष्णा काकडे हे यामुळे तणावात होते. त्यांच्याकडे 2 गाई व 2 वासरू होते. दूध विकून ते घरचा प्रपंच चालवत होते. मात्र चारा नसल्याने दुध व्यवसायावर परिणाम झाला होता. तसेच त्यांचाकडे खाजगी सावकाराचे 80 हजार रुपये कर्ज होते.

शेतीला व चाऱ्याला फटका बसल्याने उत्पन्न मिळणार नाही. यामुळे कर्ज कसे फिटेल आणि मुलीचे लग्न कसे होईल याच्या विवंचनेत काकडे होते. यातच त्यांना आज सकाळी हृद्य विकाराचा तीव्र झटका आला आणि ते गतप्राण झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आले. शोकाकुल वातावरणात धानोरा येथील शेतवस्तीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी व पिकांची नासाडी यामुळे 10 दिवसात 3 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादRainपाऊस