शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

‘दबंग’ अधिकाऱ्याने केला इंदूरचा शहराचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:14 IST

इंदूर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही ? : इंदौरमधील कचरा सफाईसाठी वॉर्ड टू वॉर्ड कोणते धोरण राबविण्यात आले. या मागे तत्कालीन आयुक्त मनीष सिंह यांनी ‘दबंग’ बनून स्मार्ट इंदूर शहराचा पाया कसा रचला याची रंजक माहिती अशी

ठळक मुद्देइंदूर शहर अल्पावधीत चकचकीत झाले. २५ ते ३० फुटांचे जुने रस्ते आता ८० आणि १०० फूट रुंद करण्यात आले. शहरात कुठेच एकही अनधिकृत होर्डिंग दिसत नाही. कितीही मोठा पाऊस झाल्यास रस्त्यावर पाणी साचत नाही. आधुनिक इंदूर शहराचा कायापालट करण्यात तत्कालीन आयुक्त मनीष सिंह यांचा सिंहाचा वाटा आहे.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : इंदूर शहर अल्पावधीत चकचकीत झाले. २५ ते ३० फुटांचे जुने रस्ते आता ८० आणि १०० फूट रुंद करण्यात आले. शहरात कुठेच एकही अनधिकृत होर्डिंग दिसत नाही. कितीही मोठा पाऊस झाल्यास रस्त्यावर पाणी साचत नाही. आधुनिक इंदूर शहराचा कायापालट करण्यात तत्कालीन आयुक्त मनीष सिंह यांचा सिंहाचा वाटा आहे. आता ते उज्जैनचे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी ‘दबंग’ बनून स्मार्ट इंदूर शहराचा पाया कसा रचला याची रंजक माहिती अशी-

२०१५ पर्यंत इंदूर शहरही देशातील इतर शहरांप्रमाणेच प्रचंड घाण, अरुंद रस्ते, चोहीकडे अधिकृत होर्डिंग, ठिकठिकाणी ड्रेनेज वाहू लागलेले, पावसाच्या पाण्याचा अजिबात निचरा नाही. अख्खी महापालिका दिवस-रात्र खाबूगिरीत मग्न होती. अशा विदारक अवस्थेत शासनाने मध्यप्रदेश आयएएस कॅडरचे मनीष सिंह यांची सप्टेंबर-२०१६ मध्ये इंदूर महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली. या हरफनमौला अधिकाऱ्याने विकास कसा करावा याचा उत्तम नमुना देशासमोर सादर केला.

सिंह सध्या उज्जैन येथे जिल्हाधिकारी आहेत. ‘लोकमत’ प्रतिनिधीसोबत तब्बल दीड तास त्यांनी गप्पा मारल्या. इंदूर शहराचा विकास कसा झाला हे त्यांनी नमूद केले. महापालिकेला कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आपण तीन वर्षांच्या कारकीर्दीत इंदूर शहराला स्वच्छतेत देशात नंबर वनचा खिताब मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचा यांत्रिकी विभाग सर्वप्रथम सक्षम केला. बाहेरून वाहनांची दुरुस्ती पूर्णपणे बंद केली. भाडेतत्त्वावरील वाहनांची हकालपट्टी करण्यात आली. १२०० वाहनांची शंभर टक्के दुरुस्ती मनपाच करते. त्यामुळे भ्रष्टाचार तर संपलाच, शिवाय पूर्वीपेक्षा शंभरपट दर्जेदार कामही होत असल्याचा दावा त्यांनी केला.

रस्ते रुंदीकरण मोहीमशहर विकास आराखड्यानुसार सर्व लहान रस्ते मोठे केले. मालमत्ताधारकांना फक्त एफएसआय दिला. एक रुपयाही आर्थिक मोबदला दिला नाही. ज्यांची रस्त्यांत पूर्णपणे मालमत्ता गेली त्यांना त्वरित पंतप्रधान आवास योजनेत घर दिले. रस्त्यांवर झोपड्या बांधून राहणाऱ्या इतर प्रांतातील नागरिकांना बसमध्ये बसवून गावी पाठवून दिले. हातगाड्यांचा मुक्त संचार होता. रस्त्यांवर हातगाडी दिसल्यास जागेवरच जेसीबीने हातगाडी मोडून जप्त करायची. दहा हजार हातगाड्यांचा बंदोबस्त केल्याचे सिंह यांनी सांगितले.

माफियांवर हल्लाबोलइंदूर शहरातील मोठा गुंड जगदीश यादव याची २५ हजारांहून अधिक जनावरे गावात फिरत असत. त्याला गोठे-जनावरे बाहेर नेण्याची विनंती केली. त्याने विनंती फेटाळून लावली. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता मी स्वत: उभे राहून त्याच्या अनधिकृत घरांसह गोठ्यांवर बुलडोझर फिरविला. या घटनेनंतर मनपा कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण महापालिका चवताळून कामाला लागली.

१ हजार कर्मचारी निलंबितइंदूर मनपात ७ हजार सफाई कामगार आहेत. त्यातील ८० टक्के निव्वळ कामचुकार होते. त्यांना साफसफाईची अगोदर ट्रेनिंग दिली. हजेरी सेंटरवर थम्ब इम्प्रेशन पद्धत आणली. योग्य सफाई न केल्यास जागेवरच १ हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. त्यापूर्वी सहा कामगार संघटनांच्या नेत्यांना विश्वासात घेतले. त्यांच्या निकटवर्तीय २०० कामगारांना आम्ही हात न लावता कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे आम्ही यशस्वी झाल्याचे सिंह यांनी हसत हसत सांगितले.

शहरात मनपाची चालते दादागिरी महात्मा गांधी रोडवर बीआरटीएसची स्वतंत्रपणे बससेवा सुरू आहे. प्रत्येक रस्ता, फुटपाथ गुळगुळीत झाला आहे. शहर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त असून, शहरात मनपाची निव्वळ दादागिरी चालते. मनपाच्या परवानगीशिवाय नवरदेवाला आजही वरात काढता येत नाही. शहरात दिवसभर फिरा धूळ कणांचा त्रास नाही. जिकडे तिकडे हिरवळच हिरवळ दिसून येते, असेही सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान