शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

हायवेसाठी १८ हजार मोठ्या झाडांची ‘कटिंग’, त्या बदल्यात खुरट्या झाडांची ‘सेटिंग’

By साहेबराव हिवराळे | Updated: August 18, 2022 12:28 IST

३० किलोमीटरमधील १८ हजार झाडे कापली : तुलनेत तीन ते पाच पट लावण्याची गरज होती

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : सोलापूर-धुळे महामार्गाच्या कामासाठी औरंगाबाद शहरालगत ३० किलोमीटर अंतरावर १८ हजार झाडांची कत्तल करण्यात आली. अगदी तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचे वटवृक्ष आणि इतर झाडांची त्यात ‘खांडोळी’ झालेली आहे. समृद्धी महामार्गातही ३ हजार झाडांची कत्तल झाली; परंतु त्या तुलनेत अजून झाडे लावण्यात आलेली नाहीत. सोलापूर हायवेला खुरटी झाडे लावून शंभर टक्के रोपण केल्याचे सांगितले जाते. दुभाजक आणि रस्त्याच्या कडेला वापरण्यात येणाऱ्या झाडांची संख्या तोडलेल्या झाडांपेक्षा पाच पटीत लावली तरी कमीच पडणार आहे.

औरंगाबाद शहराजवळून आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या महामार्गामुळे जिल्ह्यात ३२ हजार झाडांची कत्तल झाली. तसेच ४ डोंगर आणि १२ टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या. रस्त्यांच्या कामांमुळे निसर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे, वृक्षतोडीमुळे वाळवंटीकरण सुरू आहे, त्यामुळे पर्जन्यमान कमी होणार आहे. जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली आहे. महामार्ग करताना जनतेची सोय म्हणून उदो उदो केला जात आहे; पण दुसरी बाजू म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास मात्र लपवला जात आहे.

महामार्ग बांधणी करताना अनेकदा सूचना देऊनही प्राण्यांसाठी खालून आवागमनाचे मार्ग म्हणजेच अंडरपास बहुतांश ठिकाणी बनवले नाहीत किंवा त्या भागात उंच कुंपण केलेले नाही. रोज या भागात अपघातात वन्य जिवांचा मृत्यू ओढवत आहे. समृद्धी रस्त्यावरही परिस्थिती वेगळी नाही. महामार्गाच्या एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कम ही झालेल्या निसर्गहानीच्या भरपाईसाठी राखीव असताना आणि आधी वृक्षारोपण करावे, अशी तरतूद असताना वापरण्यात आलेली नाही.

वृक्षप्रेमींमध्ये नाराजीकेंद्र व राज्य शासनाला निवेदन पाठवून ‘आपण झाडे तोडली, पण लावणार कोण?’ हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने तसेच तत्कालीन राज्य शासनाने राज्यातील औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, कोकण या सर्व मुख्य अभियंत्यांना पत्रे पाठविली आहेत. मात्र, यावर अतिशय संथगतीने काम सुरू आहे.- राहुल देव मनवर

महामार्गाच्या दुतर्फा स्वदेशी झाड लावा...एप्रिल महिन्यात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तोडलेल्या झाडांच्या बदल्यात झाडे लावली नसल्याचे सांगितले. तसेच महामार्गाच्या दुतर्फा स्वदेशी स्थानिक वृक्ष लावण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक

अमृत महोत्सवातही लावली झाडे...सर्व अधिकार वन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे आहेत. वृक्षारोपणाचे काम १०० टक्क्यांपर्यंत झालेले आहे. अमृतमहोत्सवात तीसगाव परिसरात वन विभाग आणि कंपनीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे.- केतन वाकणकर, एलएनटी नियोजन अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गenvironmentपर्यावरण