शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

हायवेसाठी १८ हजार मोठ्या झाडांची ‘कटिंग’, त्या बदल्यात खुरट्या झाडांची ‘सेटिंग’

By साहेबराव हिवराळे | Updated: August 18, 2022 12:28 IST

३० किलोमीटरमधील १८ हजार झाडे कापली : तुलनेत तीन ते पाच पट लावण्याची गरज होती

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : सोलापूर-धुळे महामार्गाच्या कामासाठी औरंगाबाद शहरालगत ३० किलोमीटर अंतरावर १८ हजार झाडांची कत्तल करण्यात आली. अगदी तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचे वटवृक्ष आणि इतर झाडांची त्यात ‘खांडोळी’ झालेली आहे. समृद्धी महामार्गातही ३ हजार झाडांची कत्तल झाली; परंतु त्या तुलनेत अजून झाडे लावण्यात आलेली नाहीत. सोलापूर हायवेला खुरटी झाडे लावून शंभर टक्के रोपण केल्याचे सांगितले जाते. दुभाजक आणि रस्त्याच्या कडेला वापरण्यात येणाऱ्या झाडांची संख्या तोडलेल्या झाडांपेक्षा पाच पटीत लावली तरी कमीच पडणार आहे.

औरंगाबाद शहराजवळून आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या महामार्गामुळे जिल्ह्यात ३२ हजार झाडांची कत्तल झाली. तसेच ४ डोंगर आणि १२ टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या. रस्त्यांच्या कामांमुळे निसर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे, वृक्षतोडीमुळे वाळवंटीकरण सुरू आहे, त्यामुळे पर्जन्यमान कमी होणार आहे. जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली आहे. महामार्ग करताना जनतेची सोय म्हणून उदो उदो केला जात आहे; पण दुसरी बाजू म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास मात्र लपवला जात आहे.

महामार्ग बांधणी करताना अनेकदा सूचना देऊनही प्राण्यांसाठी खालून आवागमनाचे मार्ग म्हणजेच अंडरपास बहुतांश ठिकाणी बनवले नाहीत किंवा त्या भागात उंच कुंपण केलेले नाही. रोज या भागात अपघातात वन्य जिवांचा मृत्यू ओढवत आहे. समृद्धी रस्त्यावरही परिस्थिती वेगळी नाही. महामार्गाच्या एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कम ही झालेल्या निसर्गहानीच्या भरपाईसाठी राखीव असताना आणि आधी वृक्षारोपण करावे, अशी तरतूद असताना वापरण्यात आलेली नाही.

वृक्षप्रेमींमध्ये नाराजीकेंद्र व राज्य शासनाला निवेदन पाठवून ‘आपण झाडे तोडली, पण लावणार कोण?’ हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने तसेच तत्कालीन राज्य शासनाने राज्यातील औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, कोकण या सर्व मुख्य अभियंत्यांना पत्रे पाठविली आहेत. मात्र, यावर अतिशय संथगतीने काम सुरू आहे.- राहुल देव मनवर

महामार्गाच्या दुतर्फा स्वदेशी झाड लावा...एप्रिल महिन्यात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तोडलेल्या झाडांच्या बदल्यात झाडे लावली नसल्याचे सांगितले. तसेच महामार्गाच्या दुतर्फा स्वदेशी स्थानिक वृक्ष लावण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक

अमृत महोत्सवातही लावली झाडे...सर्व अधिकार वन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे आहेत. वृक्षारोपणाचे काम १०० टक्क्यांपर्यंत झालेले आहे. अमृतमहोत्सवात तीसगाव परिसरात वन विभाग आणि कंपनीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे.- केतन वाकणकर, एलएनटी नियोजन अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गenvironmentपर्यावरण