शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपये शिक्षण मंडळात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 6:54 PM

मंडळातील वित्त व लेखा विभागातील कुरघोडीच्या राजकारणामुळे हा निधी मंडळात पडून

ठळक मुद्दे१ लाख ७५ हजार धनादेश तयारवित्त विभाग कार्यवाही करेनावाटपाला मुहूर्त लागेना 

औरंगाबाद : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याची घोषणा झाली तेव्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले होते. घेतलेले शुल्क  विद्यार्थ्यांना परत करण्यासाठी शासनाने मंडळाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, मंडळातील वित्त व लेखा विभागाच्या दिरंगाईमुळे हा निधी वाटप करण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयीचा शासनादेशही काढण्यात आला आहे. शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून केलेला आहे.  पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणे आवश्यक होते. यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाने मंडळाला उपलब्ध करून दिला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी ४१५ रुपये आणि बारावीच्या परीक्षेसाठी ४९० रुपये शुल्क मंडळाने घेतले होते. या शुल्काची परिपूर्ती करण्यासाठीचा निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचे तात्काळ वितरण होणे आवश्यक होते. मात्र, मंडळातील वित्त व लेखा विभागातील कुरघोडीच्या राजकारणामुळे हा निधी मंडळात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मंडळाच्या सचिव सुगाता पुन्ने यांना याविषयी विचारले असता, त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचे वितरण करण्यासाठी १ लाख ७५ हजार धनादेश बँकेकडून मागविले आहेत. हे धनादेश विद्यार्थ्यांच्या नावे करण्याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याचे वितरण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, किती विद्यार्थ्यांना धनादेश देणार? किती रुपयांचे धनादेश आहेत? परीक्षा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी शासनाने किती निधी उपलब्ध करून दिला? याविषयी त्यांना सांगता आले नाही. वित्त विभागाकडून ही माहिती घेण्यास सांगितले. मंडळाच्या वित्त विभागातील वित्त अधिकारी विलास नागदिवे हे रजेवर असल्याचे सांगण्यात आले. शाखाप्रमुख असलेले आर.आर. जोगदंड हे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते, तर वरिष्ठ लिपिक एम.एस. खरात यांना विचारपूस केली असता, त्यांनी उद्धटपणे मला विचारायचे नाही. सचिव बसलेल्या आहेत, त्यांच्याकडूनच माहिती घ्या अन्यथा नागदिवे यांना विचारा, असे उत्तर दिले. मंडळाच्या वित्त विभागातील एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपये मंडळात पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे.

साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या १६ कोटी रुपयांचा प्रश्नविभागीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत इयत्ता दहावी आणि बारावीच्या तब्बल ३ लाख ५५ हजार २१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क मंडळाकडे भरले आहे. या पाचही जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर झालेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ देणे मंडळाला बंधनकारक आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी ४१५ रुपये आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून ४९० रुपये घेण्यात आले होते. त्यामुळे एकूण ३ लाख ५५ हजार २१४ विद्यार्थ्यांना १६ कोटी ४५ हजार ६१० रुपयांचा निधी वाटप करावा लागणार आहे. हा निधी केव्हा वाटप करणार? वाटप केलेले धनादेश विद्यार्थ्यांना मिळणार का? धनादेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे बँकांमध्ये खाते आहे का? खाते नसतील तर धनादेशाची मुदत संपेपर्यंत विद्यार्थी बँक खाते उघडणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :droughtदुष्काळStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकार