शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मराठवाड्यातील पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा झाला चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:02 IST

मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे; ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर पेरण्यानंतर बुड धरलेल्या पिकांचा चिखल झाला आहे. १ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून, पावणेतीन लाख हेक्टरवरील पंचनामे अद्याप होणे बाकी आहे. २३ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे जुलै महिन्यातील पावसाने नुकसान केले आहे. यातील १ लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जालना ३५५ हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली ७५ हजार ९१३, नांदेड २ लाख ९८ हजार ८६१, तर लातूर जिल्ह्यातील १६४० हेक्टरचे नुकसान झाले आहे. विभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४२० मि.मी. पाऊस झाला आहे. २५४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६६ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ६१ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ७३ दिवसांच्या पावसाळ्यात ३९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर विभागातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसाननांदेड जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ३३ हजार ४८४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. फळपीक, बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्रावरील नुकसानीचा यात समावेश आहे. जालन्यातील ३७७, परभणीतील १५००, हिंगोलीतील ८४ हजार ६९०, तर लातूरमधील ७७३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन अतिपावसामुळे वाहून गेली आहे.

सर्व प्रकल्पांत ७३ टक्के पाणीविभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ७३.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात जायकवाडी ८३ टक्क्यांवर पोहोचले आहे. निम्न दुधना ६९, येलदरी ६३, सिध्देश्वर ५०, माजलगाव ३९, मांजरा ३४, पैनगंगा ८२, मानार १०० टक्के, तर निम्न तेरणा ६०, विष्णुपरी ६८, तर सिनाकोळेगाव प्रकल्पात सध्या १९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी