शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

मराठवाड्यातील पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा झाला चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:02 IST

मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे; ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर पेरण्यानंतर बुड धरलेल्या पिकांचा चिखल झाला आहे. १ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून, पावणेतीन लाख हेक्टरवरील पंचनामे अद्याप होणे बाकी आहे. २३ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे जुलै महिन्यातील पावसाने नुकसान केले आहे. यातील १ लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जालना ३५५ हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली ७५ हजार ९१३, नांदेड २ लाख ९८ हजार ८६१, तर लातूर जिल्ह्यातील १६४० हेक्टरचे नुकसान झाले आहे. विभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४२० मि.मी. पाऊस झाला आहे. २५४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६६ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ६१ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ७३ दिवसांच्या पावसाळ्यात ३९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर विभागातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसाननांदेड जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ३३ हजार ४८४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. फळपीक, बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्रावरील नुकसानीचा यात समावेश आहे. जालन्यातील ३७७, परभणीतील १५००, हिंगोलीतील ८४ हजार ६९०, तर लातूरमधील ७७३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन अतिपावसामुळे वाहून गेली आहे.

सर्व प्रकल्पांत ७३ टक्के पाणीविभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ७३.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात जायकवाडी ८३ टक्क्यांवर पोहोचले आहे. निम्न दुधना ६९, येलदरी ६३, सिध्देश्वर ५०, माजलगाव ३९, मांजरा ३४, पैनगंगा ८२, मानार १०० टक्के, तर निम्न तेरणा ६०, विष्णुपरी ६८, तर सिनाकोळेगाव प्रकल्पात सध्या १९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी