शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मराठवाड्यातील पावणेचार लाख हेक्टरवरील पिकांचा झाला चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:02 IST

मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे; ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सुमारे पावणेचार लाख हेक्टरवर पेरण्यानंतर बुड धरलेल्या पिकांचा चिखल झाला आहे. १ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आजवर झाले असून, पावणेतीन लाख हेक्टरवरील पंचनामे अद्याप होणे बाकी आहे. २३ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. ६ लाख २० हजार शेतकऱ्यांचे जुलै महिन्यातील पावसाने नुकसान केले आहे. यातील १ लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.

मराठवाड्यात (८ ते २० जुलै) जोरदार पावसाचा साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जालना ३५५ हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली ७५ हजार ९१३, नांदेड २ लाख ९८ हजार ८६१, तर लातूर जिल्ह्यातील १६४० हेक्टरचे नुकसान झाले आहे. विभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४२० मि.मी. पाऊस झाला आहे. २५४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६६ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ६१ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ७३ दिवसांच्या पावसाळ्यात ३९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर विभागातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसाननांदेड जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ३३ हजार ४८४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २ लाख ९८ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. फळपीक, बागायत क्षेत्र, जिरायत क्षेत्रावरील नुकसानीचा यात समावेश आहे. जालन्यातील ३७७, परभणीतील १५००, हिंगोलीतील ८४ हजार ६९०, तर लातूरमधील ७७३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन अतिपावसामुळे वाहून गेली आहे.

सर्व प्रकल्पांत ७३ टक्के पाणीविभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ७३.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यात जायकवाडी ८३ टक्क्यांवर पोहोचले आहे. निम्न दुधना ६९, येलदरी ६३, सिध्देश्वर ५०, माजलगाव ३९, मांजरा ३४, पैनगंगा ८२, मानार १०० टक्के, तर निम्न तेरणा ६०, विष्णुपरी ६८, तर सिनाकोळेगाव प्रकल्पात सध्या १९ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी