शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतकऱ्यांऐवजी पीकवीमा कंपन्या मालामाल; भरले ३७३ कोटी, मिळणार ४४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 20:02 IST

२०२० मध्ये जिल्ह्यातील ८ लाख ३३ हजार १०८ शेतकऱ्यांनी ३ लाख ५९ हजार ७५२ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता भरला.

ठळक मुद्देखरीप हंगामातील स्थिती नुकसान लाखांत, मदत हजारात

- योगेश पायघनऔरंगाबाद : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गतवर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात जिल्ह्यातील ८ लाख ३३ हजार १०८ शेतकऱ्यांनी पीकविम्यापोटी ३७३ कोटी ९९ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला; मात्र केवळ १ लाख ४१ हजार ९७२ शेतकऱ्यांना पीकविम्याचा ४४ कोटी चार लाख रुपयांचा लाभ मिळाल्याने पीक विम्यात शेतकऱ्यांऐवजी केवळ विमा कंपन्या मालामाल झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

२०२० मध्ये जिल्ह्यातील ८ लाख ३३ हजार १०८ शेतकऱ्यांनी ३ लाख ५९ हजार ७५२ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता भरला. त्यातून १२५१ कोटी ७३ हजार ७४६ रुपयांचे विमा संरक्षण मिळविले. गतवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने २ लाख ६५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले होते; मात्र केवळ १ लाख ४१ हजार ९७२ शेतकऱ्यांना पीकविम्याचा ४४ कोटी चार लाख रुपयांचा लाभ मिळाला. लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम यायला सुरुवात झाली आहे; मात्र नुकसान लाखांत आणि मदत हजारात, अशी परिस्थिती आहे. तर काही शेतकऱ्यांना तर सातशे किंवा आठशे रुपयांचीही विम्याची मदत आली आहे.

सुमारे सात लाख शेतकरी बादपीकविमा भरला म्हणजे तो सर्वांनाच दिला जात नाही. पीकविमा भरलेल्यांपैकी ६ लाख ९१ हजार १३६ शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. मंडळात एकूण उंबरठा उत्पन्न अधिक असेल तर त्या मंडळातील शेतकऱ्यांना विमा नाकारला जातो. अतिवृष्टीमुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातून ४ हजार ३३० शेतकऱ्यांनी नुकसानाच्या ७२ तासांच्या आत ऑनलाइन तक्रारी केल्या. ४३३० पैकी ४२७३ तक्रारींचे सर्वेक्षण केले गेले. तर १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. अनेक वेळा तक्रारी वेळेत नसल्याने कंपन्यांकडून नुकसानाचे दावे फेटाळले जातात. अपवादात्मक परिस्थिती वगळता कंपन्यांकडून ऑफलाइन तक्रारींची दखल घेतली जात नाही.

कृषी विभागाकडे माहिती उपलब्ध नाहीवैजापूर तालुक्यातील पीक संरक्षित क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ८५ हजार ७४८ हजार हेक्टर होते. तसेच कन्नड, गंगापूर, सोयगाव तालुक्यात नुकसान अधिक झाल्याची नोंद होती. त्यामुळे लाभार्थीही याच तालुक्यातील सर्वाधिक असण्याची शक्यता आहे; मात्र कृषी अधीक्षक कार्यालयात पीकविम्याची माहिती ठेवणारे अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्याने माहिती उपलब्ध नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक डाॅ. तुकाराम मोटे यांनी सांगितले. त्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी किती रक्कम दिली, याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

खरीप हंगाम २०२०-२१पीकविमा लागवड क्षेत्र- ३,५९,७५२.४१ हेक्टरएकूण जमा रक्कम -३७३.९९ कोटीशेतकरी संख्या -८,३३,१०८विमा संरक्षित रक्कम -१२७५.०६ कोटीएकूण मंजूर पीकविमा -४४.०४ कोटीप्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे -३८.०१ कोटीराज्य सरकारचा हप्ता -१७० कोटी ८१ लाख ५३ हजार ६८४ रुपयेकेंद्र सरकारचा हप्ता -१५९ कोटी ३३ लाख २ हजार २३३ रुपयेलाभार्थी शेतकरी -१,४१,९७२विमा मिळालेले शेतकरी -१,४१,९७२

विमा भरुन भरपाई नाहीदरवर्षी वेळेवर पीकविमा भरतो. वस्तुस्थितीनुसार झालेल्या नुकसानाचा मोबदला आतापर्यंत मिळाला नाही. नुकसान लाखांत असते, तर मोबदल्याची रक्कम कागदोपत्री अर्ज आणि पाठपुरावा करण्याइतपतही मिळत नाही.- प्रकाश आगे, शेतकरी.

पीकविमा काढून उपयोग काय?अतिवृष्टीत पूर्ण शेतीचे नुकसान झाले. पीकविमा भरला होता; मात्र खरीप हंगामातील पीकविम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे पीकविमा काढून उपयोग काय, असाही प्रश्न पडतो.- कैलास पंडित, शेतकरी.

विमा नाकारण्यात आलाअतिवृष्टीत नर्सरीसह खरीप पिकांचे नुकसान झाले; मात्र मंडळातील उंबरठा उत्पादन अधिक असल्याने यावेळी विमा नाकारण्यात आला. वस्तूस्थितीचा पंचनामा करून पीकविमा दिला गेला पाहिजे. केवळ कागदोपत्री नियमांवरून विमा नाकारणे योग्य नाही.-हर्षल राऊत

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाAurangabadऔरंगाबाद