अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
By Admin | Updated: December 15, 2014 00:49 IST2014-12-15T00:38:35+5:302014-12-15T00:49:24+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगरासह परिसरात आज पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ऊस, तूर, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
वाळूज महानगर : वाळूज महानगरासह परिसरात आज पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ऊस, तूर, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरीदादा हवालदिल झाला
आहे.
वरुणराजाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. दुबार पेरणी करूनही वरुणराजा बरसला नसल्याने कर्जबाजारी झालेला शेतकरी अधिकच हवालदिल झाला. अपुरा पाऊस होऊनही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिके जगवली.
कापूस, ऊसतोडणीला आला आहे, तर तूर काढणीला. ऊस, कापूस, तूर, गहू आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आली आहेत; परंतु आज पहाटे वाळूज महानगरासह परिसरातील पाटोदा, वळदगाव, जोगेश्वरी, रांजणगाव शेणपुंजी, वडगाव कोल्हाटी, पंढरपूर, वाळूज, लांझी, तीसगाव, रामराई, टेंभापुरी आदी भागांत जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे ऊस, गहू, तूर खाली पडली आहे.
कापसाची बोंडे गळून गेली असून कापसाच्या वाती झाल्या आहेत. ऊस, कापूस, गहू, तूर आदी पिक ांचे, तसेच कांदा, वांगे व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके हातची जात असल्याने शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरीराजा आर्थिकदृष्ट्या अधिक चिंतेत सापडला आहे.