शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

नारेगाव येथील कचरा नष्ट करण्याचा खर्च ५० कोटीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 5:40 PM

महापालिकेने ३५ वर्षे नारेगाव येथे कचरा टाकला. या कचऱ्यावर मनपाकडून कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नाही.

ठळक मुद्देमनपा करणार संशोधन सुसज्ज मैदानाचे स्वप्न

औरंगाबाद : महापालिकेने ३५ वर्षे नारेगाव येथे कचरा टाकला. या कचऱ्यावर मनपाकडून कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नाही. मागील नऊ महिन्यांपासून नारेगाव येथे कचरा टाकणे बंद आहे. मागील अनेक वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येईल, असे आश्वासन मनपाने खंडपीठाला यापूर्वीच दिले आहे. लाखो मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाला किमान ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नारेगाव कचरा डेपोच्या जागेवर सुसज्ज मैदान उभारण्याचे स्वप्न मनपा प्रशासनाने बघितले आहे. सध्या पडून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया कशी करायची याचा अभ्यास करण्यासाठी खाजगी संस्थेच्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात येईल. कचरा नष्ट करण्यासाठी निविदा काढण्याचा विचार मनपा प्रशासनाने सुरू केला आहे. नारेगाव येथे किमान २० ते २५ लाख मेट्रिक टन कचरा असावा, असा अंदाज आहे. यातील ६० टक्के कचऱ्याचे रूपांतर खत आणि मातीत झाले आहे. हा सर्व मिक्स पद्धतीचा कचरा असून, त्यात कॅरिबॅग, लोखंड, काच, ड्रेब्रीज वेस्टही आहे.

अनेक वर्षे हा कचरा असाच पडून राहिला तरी तो नष्ट होणार नाही. या संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करून प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर आहे. शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून जागेवरच कचरा नष्ट करता येऊ शकतो का, याचीही चाचपणी मनपा प्रशासन करीत आहे. नारेगाव कचरा डेपोप्रश्नी खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या असताना महापालिका प्रशासनाने एक वर्षात संपूर्ण जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले आहे.

या कचऱ्यावर लवकरच प्रक्रिया करायची असल्यास मनपाकडे आर्थिक तरतूद अजिबात नाही. यापूर्वी राज्याने मनपाला ९० कोटींचा निधी दिला. या निधीतून कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी कामे सुरू आहेत. जुन्या कचऱ्यासाठी मनपाला परत एकदा राज्य शासनाकडेच निधीची मागणी करावी लागणार आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpollutionप्रदूषण