शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Coronavirus Unlock : औरंगाबादहून १७ जूनपासून विमानसेवेचे 'टेकऑफ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:13 PM

औरंगाबाद - दिल्ली विमानसेवा : विमानसेवची प्रतीक्षा अखेर संपली, उद्योजकांच्या प्रयत्नांना यश

ठळक मुद्देकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या अडीच महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे. इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद या हवाई मार्गावर १७ जूनपासून उड्डाण करण्याचे नियोजन केले आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबादकरांची विमानसेवेची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. विमानतळावरून १७ जूनपासून औरंगाबाद - दिल्ली विमानसेवेचे उड्डाण होणार आहे. यासाठी इंडिगोने बुकिंग सुरू केली आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या अडीच महिन्यांपासून विमानसेवा बंद आहे. औरंगाबादहून जुलैपासून विमामांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली. जुलैऐवजी जूनपासून औरंगाबादहुन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी उद्योजक सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली होती. याविषयी काय निर्णय घेण्यात येतो, याकडे लक्ष लागले होते.

मुंबईसह विविध शहरांतून २५ मे पासून विमानांचे उड्डाण सुरू झाले. परंतु औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. औरंगाबादची विमानसेवा वेटिंगवर होती. दुसरीकडे दिवसाला सुमारे तीनशे रुग्णांची वाढ होणाऱ्या पुणे शहरातून विमानसेवा सुरु झाली होती. मात्र, दुसरीकडे दिवसभरात अवघे काही रूग्ण वाढणाऱ्या औरंगाबादेत विमानसेवा का सुरु केली जात नाही, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला होता. उद्योग, व्यापारासाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उद्योजकांनी केली. अखेर इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद या हवाई मार्गावर १७ जूनपासून उड्डाण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAurangabadऔरंगाबादCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक