शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाची साखळी तुटतेय; पॉझिटिव्ह रुग्णांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 7:04 PM

शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरल्याने कोरोनाचा विळखा कमी होताना दिसत आहे.

ठळक मुद्दे १०० टक्के लॉकडाऊननंतर रुग्णांचा आलेख घसरला

औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने १५ ते २० मेदरम्यान १०० टक्के लॉकडाऊन पाळण्यात आले. हे ६ दिवस कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यानंतर शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरल्याने कोरोनाचा विळखा कमी होताना दिसत आहे.

औरंगाबादेत २७ एप्रिल रोजी  २९ रुग्णांचे निदान झाले आणि एकच खळबळ उडाली. एका दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ होती; परंतु या दिवसापासून रोजच वाढते रुग्ण निदान होण्यास सुरुवात झाली. निदान होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. एका दिवशी १०० रुग्णांचे निदानही शहरात झाले. त्यामुळे कोरोनाचा विळखा घट्ट होत गेला. शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. लॉकडाऊन कडक करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली.  ३ ते १४ मेदरम्यान विषम तारखेला शहर शंभर टक्के लॉकडाऊन,  तर सम तारखेला केवळ सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली. त्यानंतर १५ ते २० मेदरम्यान १०० टक्के लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. हा आकडा शून्यावर केव्हा येतो याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

असा झाला फायदा : १०० टक्के लॉकडाऊनमुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात अन्य व्यक्ती येण्याचे टळले. तसेच बाधित व्यक्ती या घरातच राहिल्या. त्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची म्हणजे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली. सम-विषम तारखेच्या लॉकडाऊनच्या कालावधीत आणि सध्याही नागरिकांना काही मोजके तासच मुभा देण्यात आली. तेही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयोगी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज निदान होणाऱ्या रुगणांच्या संख्येत घट होत आहे. विशेषत: १०० टक्के लॉकडाऊननंतर रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. हीच स्थिती राहिल्यास शहर कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद