Coronavirus In Aurangabad : कोरोनाबाधित ३ रुग्णांचा बळी; एकूण मृत्यू ३६७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:23 IST2020-07-15T14:23:09+5:302020-07-15T14:23:25+5:30
आजघडीला ३३८५ जणांवर उपचार सुरु आहेत.

Coronavirus In Aurangabad : कोरोनाबाधित ३ रुग्णांचा बळी; एकूण मृत्यू ३६७ वर
औरंगाबाद : घाटीत उपचार सुरू असताना ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३६७ झाली आहे.
चिकलठाणा येथील ४५ वर्षीय पुरुष , हिलाल कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष आणि घाटी येथील निवासस्थानातील ७० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने बुधवारी दिली. कोरोनामुळे जिल्हात मृत्यू होण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. परंतु दररोज रुग्णांचा मृत्यू होणे सुरूच आहे.
आज ३९ रुग्णांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात परीक्षण केलेल्या ७८१ स्वॅबपैकी ३९ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. यात मनपा हद्दीतील २१ आणि ग्रामीण भागातील ७ रूग्ण आहेत. तर शहरात प्रवेश करणाऱ्या ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१०४ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५३५५ रूग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ३३८५ जणांवर उपचार सुरु आहेत.