शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Corona Virus : विनाकारण घराबाहेर पडाल तर पासपोर्ट, व्हिसाला मुकाल; पोलीस नोंदवित आहेत गंभीर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 2:58 PM

Corona Virus in Aurangabad : हे गुन्हे सहजासहजी परत घेता येणे शासनाला शक्य होणार नाही, यासाठी ही काळजी घेतली जात असल्याचे सूत्राने सांगितले.

ठळक मुद्देसावधान ! घराबाहेर पडाल तर...पोलीस नोंदवित आहेत गंभीर गुन्हेखटल्यास सामोरे जाऊन जबर शिक्षाही भोगण्याची ठेवा तयारी

औरंगाबाद: लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ (सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाची अवहेलना करणे) या गुन्ह्यासोबत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे, साथरोगाचा प्रसार करून इतरांचा जीव धोक्यात घालणे कलम २६९ आणि कलम २७० नुसार गुन्हे दाखल केले जात आहे. गंभीर स्वरूपाचे ही कलमे असल्यामुळे त्याचे गंभीर परिणामही नागरिकांना भोगावे लागू शकतात. शासनाने ठरवले तरी ही गुन्हे सहजासहजी परत घेतले जाऊ शकत नाहीत.

वाढत्या कोविड संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी गतवर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गतवर्षी कोविडची प्रचंड भीती नागरिकांच्या मनात होती. ही बाब लक्षात घेऊन विनापरवानगी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ नुसार (लोकसेवकांच्या आदेशाचे पालन न करणे) तब्बल २ हजार १४९ गुन्हे शहर पोलिसांनी नोंदविले. मात्र तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे गुन्हे परत घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान, त्यांचे पद गेले आणि गुन्हे परत घेण्याविषयी कोणतेही आदेश पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. असे असले तरी कलम १८८ सारखी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे शासन सहज परत घेऊ शकते ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिसांनी कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांवर कलम १८८ सोबतच कलम २६९, २७० आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे आदी गंभीर स्वरूपाचे कलमे लावून गुन्हा नोंद करीत आहेत. हे गुन्हे सहजासहजी परत घेता येणे शासनाला शक्य होणार नाही, यासाठी ही काळजी घेतली जात असल्याचे सूत्राने सांगितले.

व्हिसाही नाकारला जाऊ शकतोपोलिसांकडून नोंद केल्या जात असलेल्या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. या गुन्ह्याच्या खटल्याला सामोरे जावे लागेल. यासोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अनेक देशाकडून व्हिसा नाकारला जातो. शिवाय पासपोर्ट मिळवितानाही अडचणी येण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा दाखल होणाऱ्या गुन्ह्याचे गांभीर्य आता तरी लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस