शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

अहो, कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 17:13 IST

Corona Virus : पहिल्या अनलाॅकमध्ये केलेल्या चुकांमुळे दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच तारांबळ उडाली.

ठळक मुद्दे निर्बंध शिथिल झाले तरी सभा, समारंभ, लग्न, अंत्यविधीतील गर्दी टाळा मला काही होत नाही, ही वृत्ती सोडून कोणतेही लक्षणे दिसताच उपचार घ्या

- योगेश पायघन औरंगाबाद : कोरोना अद्याप गेलेला नाही. पुढील किमान पाच ते सहा महिने तरी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. पहिल्या अनलाॅकनंतर केलेल्या त्या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल झाले तरी सभा, समारंभ, लग्न, अंत्यविधीतील गर्दी टाळा, लसीकरणाला प्राथमिकता द्या, कोरोनाची त्रिसूत्री पाळा, मला काही होत नाही, ही वृत्ती सोडून कोणतेही लक्षणे दिसले तर दुखणे अंगावर न काढता उपचार घ्या, आता काही होत नाही म्हणून सुपरस्प्रेडर बनू नका, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी केले.

कोरोना बाधितांचे आकडे हळूहळू कमी होऊन बाधितांसह सक्रिय रुग्णांची संख्या जिल्ह्यात ३ हजाराच्या जवळ आली आहे. १ जूनपासून निर्बंधही शिथिल व्हायला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या अनलाॅकमध्ये केलेल्या चुकांमुळे दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच तारांबळ उडाली. इतके संक्रमण जिल्ह्यात वाढले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेकडे मार्गक्रमण होऊ नये. ती लाट थोपवताना पहिल्या लाटेतून दुसऱ्या लाटेकडच्या प्रवासातून धडा घेण्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. प्रत्येकाने कोरोनाचे संक्रमण स्वत:ला, कुटुंबाला, शेजाऱ्यांना, परिसरात, गावात होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहे.

या पाच चुका पुन्हा करू नका!१-सण, सभा, समारंभ, धार्मिक कार्यक्रम, लग्न, अंत्यविधी, आंदोलनांत गर्दी.२-कोरोनापासून बचावासाठी मास्क, सुरक्षित अंतर, वेळोवेळी हात धुणे या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष.३-लक्षणे दिसल्यावर कोरोनाच्या तपासणीला टाळाटाळ, मला काही होत नाही म्हणत अंगावर दुखणे काढले, ते सुपरस्प्रेडर बनले.४-कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यावरही मास्क टाळला. सर्दी, ताप, खोकल्यावर घरगुती उपाय करून लक्षणे लपवली.५-अनलाॅकनंतर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, बाजारपेठा, हाॅटेल्स, पर्यटनात त्रिसूत्री दुर्लक्षित करून बिनधास्त वावर.

पथकांची असेल नजर-३० माजी सैनिकांचे नागरी मित्र पथक नागरिक कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, निर्बंध, नियमांचे सामान्य नागरिकांना अंमलबजावणी करण्याकडे लक्ष ठेवून दंडात्मक कारवाई करते.-व्यापारी पेठा, बाजारपेठा, आस्थापना घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन कसे करते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाने दहा पथकांची स्थापना केलेले आहे.- अन्न औषध प्रशासक, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी यांचेही एक फिरते पथक जिल्ह्यात उपयायोजनांची अंमलबजावणी होते का काय याकडे लक्ष ठेवून असते.- ग्रामीण भागात ग्रामदक्षता समित्या, तालुका समन्वय अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांची पथके वेळोवेळी दौऱ्यात नियम, निर्बंधांचे पालन होते का याची खातरजमा करून आवश्यक तेथे दंडात्मक कार्यवाही करतात.- शहरासह जिल्ह्यात पोलीस दलाकडूनही ठिकठिकाणी नाकाबंदी, नागरिकांना पोलीस वाहनांवरून आवाहन करून कोरोनाचे नियम पाळण्यासंबंधी आवाहन करण्यात येते.

पहिला अनलाॅक : ४ ऑगस्ट २०२०एकूण कोरोना रुग्ण -१५,१५०बरे झालेले रुग्ण -११,३६८मृत्यू -४९३

दुसरा अनलाॅक : १ जून २०२१एकूण कोरोना रुग्ण -१,४२,८८९बरे झालेले रुग्ण - १,३६,४६३मृत्यू -३,२१४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लस