शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

अजिंठा लेणीतील पर्यटनाला कोरोनाचा फास; ५०० कुटुंबांच्या रोजीरोटीवर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 08:35 IST

यंदा जोरदार पाऊस झाल्याने निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करीत आहे; परंतु त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकच नसल्याने येथील रम्यपणा हरवून सन्नाटा बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देनिसर्गसौंदर्याची उधळण, पण पर्यटकच नाहीत पाच महिन्यांपासून अनेकजण बेरोजगार

- उदयकुमार जैन

औरंगाबाद  : कोरोनामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या परिसरातील ५०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथे येणारा पर्यटकच येथील व्यावसायिकांसाठी ‘अतिथी देवो भव’ असला तरी कोरोनाने त्याची वाट रोखल्याने लेण्याचे अर्थकारण शून्यावर आले आहे. 

१७ मार्चपासून लेणी बंद असल्याने येथील चलनच बंद झाले आहे. वास्तविक यंदा जोरदार पाऊस झाल्याने निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण करीत आहे; परंतु त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकच नसल्याने येथील रम्यपणा हरवून सन्नाटा बघायला मिळत आहे. १५ आॅगस्टनंतर येथील ‘पीक सीझन’ सुरू होतो आणि तो फेब्रुवारीपर्यंत चालतो. वर्षभरात सरासरी साडेतीन लाख भारतीय व ५० हजार विदेशी पर्यटक येथे भेट देत असतात. याशिवाय शैक्षणिक सहलींच्या रूपाने ५० हजारांवर विद्यार्थी, शिक्षकमंडळी येथे येतात. यातून जवळपास पाच कोटींची आर्थिक उलाढाल होते; परंतु यंदा ती कोरोनामुळे ठप्प झाली आहे. याचा फास मात्र स्थानिक कामगार, मजूर, नोकर, व्यावसायिकांना बसला आहे. आजघडीला त्यांना पर्यायी रोजगारही उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर प्रथमच एवढे भीषण संकट ओढवले आहे.

दैनंदिन धांडोळा लेणीच्या टी-पॉइंटवर पर्यटकांना खरेदीसाठी ७८ दुकाने महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने बांधून दिली आहेत. शिवाय पार्किंग, एमटीडीसी व भारतीय पुरातत्व विभागाचे लेणी दर्शन तिकीट, डझनभर प्रदूषणमुक्त बस, उपाहारगृहे, ढाबे, लॉज, एमटीडीसीचे हॉलीडे रिसॉर्ट, रिक्षाचालक,  सफाई कामगार, ४० डोलीवाले, १०० फेरीवाले, १० गाईड,  पोस्ट कार्ड व गाईड बुक विक्रेते, भेळपुरीचालक, रंगीबेरंगी दगड विक्रेते, पादत्राणे दुकाने, नाश्ता व टी स्टॉल असा येथील एकंदरीत धांडोळा. याच माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. यातून परिसरातील फर्दापूर, अजिंठा गाव, सावरखेडा, लेणापूर, ठाणा, वरखेडी, पिंपळदरी येथील जवळपास ५०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो; परंतु १७ मार्चनंतर हे चलन येणे बंद झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

गेल्या १६० दिवसांपासून नैराश्य आणि चिंतायाबाबत येथील व्यावसायिक जयेश बत्तिसे, रमेश पाटील, धनलाल मंडावरे, संजय जाधव, राजू कापसे, योगेश शिंदे, सय्यद राजिक हुसेन, शेख रफिक शेख जाफर, महेबूब पठाण, शकूलाल लव्हाळे, भगवान जाधव, शिवाजी जाधव, प्रकाश हातोळे, हसन बाबा, शेख फईम शेख मुस्तफा, सय्यद लाल, रज्जाक तडवी, अफसर पठाण, शेख अलीम शेख बुºहाण, राजू शर्मा, शेख अकील, रफिकखाँ कादरखाँ, अ. रहेमान, हकीमखा आजमखाँ, सज्जादखाँ गुलाबखाँ, तसेच डोलीचालक चंदू आरक, विष्णू सपकाळ, विजय बिरारे, युवराज दामोदर यांनी सांगितले की, आम्ही १६० दिवसांपासून चक्क घरात बसून आहोत. त्यामुळे उपासमारीची वेळ कुटुंबांवर आली आहे. घरातील सदस्य व आम्ही दुसरीकडे रोजंदारीवरही जायला तयार आहोत, पण कुठेही रोजगार नसल्याने चिंतेने नैराश्य आले आहे. कुटुंबांचे रहाटगाडगे चालविण्यासाठी कर्जबाजारी झालो असून, आता पैसेही संपले आहेत. लेणी सुरू झाल्यावरच आमदनी सुरू होणार आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करायला हवी.

आर्थिक संकटाचे सलग तिसरे वर्षगेल्या २ वर्षांपासून रस्त्याच्या समस्येमुळे आधीच पर्यटक येणे कमी झाले आहे. त्यात यंदा कोरोनाने भर टाकली. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही निराशा पदरी पडली. येथील अर्थचक्र थांबल्याने एमटीडीसीने दुकानदारांचे दोन वर्षांचे भाडे माफ करावे, वीज बिल माफ करावे, बँकेने बिनव्याजी कर्ज द्यावे, शासनाने विशेष बाब म्हणून येथे आर्थिक पॅकेज द्यावे, प्रकल्पधारकांना ९९ वर्षांच्या करारावर संपादित केलेली शेती कसायला द्यावी, परिसरात शासन व एमटीडीसीने रोजगारनिर्मिती करावी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फेडरेशनच्या माध्यमातून आपण यासाठी प्रयत्न करणार आहोत.-पपींद्रपालसिंग वाय.टी. (माजी अध्यक्ष अजिंठा लेणी दुकानदार संघटना व एटीडीएफ सदस्य)

एमटीडीसीलाही लाखोंचा फटकाअजिंठा लेणीतील आमचे उपाहारगृह, पर्यटक निवास व इतर सुविधा केंद्रे बंद असल्याने लाखोंचा फटका बसला आहे; परंतु उत्पन्न बंद असले तरी कुठल्याही कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलेले नाही. त्यांच्या माध्यमातून सर्व मेन्टेन ठेवले आहे. लेणी सुरू होताच येणाऱ्या पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही. -अखिलेश शुक्ला, प्रादेशिक महाव्यवस्थापक, महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्या