शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
2
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
3
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
4
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
5
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
7
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
8
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
9
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
10
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
11
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
12
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
13
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
14
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
15
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
16
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
17
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
18
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
19
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
20
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने आई-वडील हिरावलेल्या मुलांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:02 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोना महामारीने समाज आणि शासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. कोरोनाने हजारो नागरिकांना आतापर्यंत जीव ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोना महामारीने समाज आणि शासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. कोरोनाने हजारो नागरिकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला. मृत्युसत्र अजूनही थांबलेले नाही. कोरोना विषाणूने अनेक बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले. आई-वडीलच दगावल्यामुळे मुले अनाथ झाली आहेत. अनाथ बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता राज्य शासनाने स्वीकारली आहे. मुलांच्या नातेवाइकांनी त्यांचा सांभाळ केल्यास, शासनाकडून आर्थिक साहाय्यही देण्यात येईल.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक जीवितहानी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला. संशयित कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या यापेक्षा तीनपट आहे. दुसऱ्या लाटेत ३० ते ४५ वयोगटांतील नागरिकांचे प्रमाणही चांगलेच वाढीस लागले आहे. अनेक कुटुंबांमधील आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या लहान मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील अशा बालकांचा शोध घेण्यात येत आहे. ज्यांचे पालक कोरोनाने हिरावले आहेत, त्यांना आर्थिक, शैक्षणिक आधार देण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, जिल्ह्यात किती बालक आहेत, याचा आकडा समोर येईल, असे महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १,१०० रुपयांची मदत...

कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास, अशा बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंगोपन योजनेतून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

या योजनेतून यापूर्वी ४२५ रुपयांची मदत मिळत होती. आता सरकारने ही मदत दरमहा १,१०० रुपयांपर्यंत वाढविली आहे.

बालकल्याण विभाग अशा बालकांचा अहवाल बाल समितीसमोर सादर करेल. नातेवाईक सांभाळ करण्यास तयार झाले, तर त्यांना अकराशे रुपयांची मदत वर्षभर मिळणार आहे.

या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...

सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगाव घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलांची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे.

ज्या मुलाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाहीत, अशी परिस्थिती असेल, तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल. पाठीशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास, शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.

.....................

सर्वेक्षण सुरू आहे

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे. सर्वेक्षणात सापडलेल्या बालकांचा अहवाल तयार करून बाल समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्या-त्या बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत बालसमिती योग्य तो निर्णय घेईल.

- हर्षा देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.