शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

कोरोनाने आई-वडील हिरावलेल्या मुलांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:02 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोना महामारीने समाज आणि शासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. कोरोनाने हजारो नागरिकांना आतापर्यंत जीव ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोना महामारीने समाज आणि शासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. कोरोनाने हजारो नागरिकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला. मृत्युसत्र अजूनही थांबलेले नाही. कोरोना विषाणूने अनेक बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले. आई-वडीलच दगावल्यामुळे मुले अनाथ झाली आहेत. अनाथ बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता राज्य शासनाने स्वीकारली आहे. मुलांच्या नातेवाइकांनी त्यांचा सांभाळ केल्यास, शासनाकडून आर्थिक साहाय्यही देण्यात येईल.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक जीवितहानी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला. संशयित कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या यापेक्षा तीनपट आहे. दुसऱ्या लाटेत ३० ते ४५ वयोगटांतील नागरिकांचे प्रमाणही चांगलेच वाढीस लागले आहे. अनेक कुटुंबांमधील आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या लहान मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील अशा बालकांचा शोध घेण्यात येत आहे. ज्यांचे पालक कोरोनाने हिरावले आहेत, त्यांना आर्थिक, शैक्षणिक आधार देण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, जिल्ह्यात किती बालक आहेत, याचा आकडा समोर येईल, असे महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १,१०० रुपयांची मदत...

कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास, अशा बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंगोपन योजनेतून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

या योजनेतून यापूर्वी ४२५ रुपयांची मदत मिळत होती. आता सरकारने ही मदत दरमहा १,१०० रुपयांपर्यंत वाढविली आहे.

बालकल्याण विभाग अशा बालकांचा अहवाल बाल समितीसमोर सादर करेल. नातेवाईक सांभाळ करण्यास तयार झाले, तर त्यांना अकराशे रुपयांची मदत वर्षभर मिळणार आहे.

या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...

सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगाव घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलांची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे.

ज्या मुलाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाहीत, अशी परिस्थिती असेल, तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल. पाठीशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास, शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.

.....................

सर्वेक्षण सुरू आहे

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे. सर्वेक्षणात सापडलेल्या बालकांचा अहवाल तयार करून बाल समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्या-त्या बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत बालसमिती योग्य तो निर्णय घेईल.

- हर्षा देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.