शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

कोरोनाने आई-वडील हिरावलेल्या मुलांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:02 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोना महामारीने समाज आणि शासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. कोरोनाने हजारो नागरिकांना आतापर्यंत जीव ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोना महामारीने समाज आणि शासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. कोरोनाने हजारो नागरिकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला. मृत्युसत्र अजूनही थांबलेले नाही. कोरोना विषाणूने अनेक बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले. आई-वडीलच दगावल्यामुळे मुले अनाथ झाली आहेत. अनाथ बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता राज्य शासनाने स्वीकारली आहे. मुलांच्या नातेवाइकांनी त्यांचा सांभाळ केल्यास, शासनाकडून आर्थिक साहाय्यही देण्यात येईल.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक जीवितहानी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला. संशयित कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या यापेक्षा तीनपट आहे. दुसऱ्या लाटेत ३० ते ४५ वयोगटांतील नागरिकांचे प्रमाणही चांगलेच वाढीस लागले आहे. अनेक कुटुंबांमधील आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या लहान मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील अशा बालकांचा शोध घेण्यात येत आहे. ज्यांचे पालक कोरोनाने हिरावले आहेत, त्यांना आर्थिक, शैक्षणिक आधार देण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, जिल्ह्यात किती बालक आहेत, याचा आकडा समोर येईल, असे महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १,१०० रुपयांची मदत...

कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास, अशा बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंगोपन योजनेतून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

या योजनेतून यापूर्वी ४२५ रुपयांची मदत मिळत होती. आता सरकारने ही मदत दरमहा १,१०० रुपयांपर्यंत वाढविली आहे.

बालकल्याण विभाग अशा बालकांचा अहवाल बाल समितीसमोर सादर करेल. नातेवाईक सांभाळ करण्यास तयार झाले, तर त्यांना अकराशे रुपयांची मदत वर्षभर मिळणार आहे.

या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...

सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगाव घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलांची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे.

ज्या मुलाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाहीत, अशी परिस्थिती असेल, तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल. पाठीशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास, शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.

.....................

सर्वेक्षण सुरू आहे

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे. सर्वेक्षणात सापडलेल्या बालकांचा अहवाल तयार करून बाल समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्या-त्या बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत बालसमिती योग्य तो निर्णय घेईल.

- हर्षा देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.