शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

कोरोनाने आई-वडील हिरावलेल्या मुलांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:02 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोना महामारीने समाज आणि शासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. कोरोनाने हजारो नागरिकांना आतापर्यंत जीव ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोना महामारीने समाज आणि शासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. कोरोनाने हजारो नागरिकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला. मृत्युसत्र अजूनही थांबलेले नाही. कोरोना विषाणूने अनेक बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले. आई-वडीलच दगावल्यामुळे मुले अनाथ झाली आहेत. अनाथ बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता राज्य शासनाने स्वीकारली आहे. मुलांच्या नातेवाइकांनी त्यांचा सांभाळ केल्यास, शासनाकडून आर्थिक साहाय्यही देण्यात येईल.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक जीवितहानी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला. संशयित कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या यापेक्षा तीनपट आहे. दुसऱ्या लाटेत ३० ते ४५ वयोगटांतील नागरिकांचे प्रमाणही चांगलेच वाढीस लागले आहे. अनेक कुटुंबांमधील आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या लहान मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील अशा बालकांचा शोध घेण्यात येत आहे. ज्यांचे पालक कोरोनाने हिरावले आहेत, त्यांना आर्थिक, शैक्षणिक आधार देण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, जिल्ह्यात किती बालक आहेत, याचा आकडा समोर येईल, असे महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १,१०० रुपयांची मदत...

कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास, अशा बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंगोपन योजनेतून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

या योजनेतून यापूर्वी ४२५ रुपयांची मदत मिळत होती. आता सरकारने ही मदत दरमहा १,१०० रुपयांपर्यंत वाढविली आहे.

बालकल्याण विभाग अशा बालकांचा अहवाल बाल समितीसमोर सादर करेल. नातेवाईक सांभाळ करण्यास तयार झाले, तर त्यांना अकराशे रुपयांची मदत वर्षभर मिळणार आहे.

या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...

सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगाव घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलांची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे.

ज्या मुलाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाहीत, अशी परिस्थिती असेल, तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल. पाठीशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास, शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.

.....................

सर्वेक्षण सुरू आहे

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे. सर्वेक्षणात सापडलेल्या बालकांचा अहवाल तयार करून बाल समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्या-त्या बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत बालसमिती योग्य तो निर्णय घेईल.

- हर्षा देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.