शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

‘शिक्षण अधिकार’मध्ये या वर्षात प्रवेश न दिलेल्यांना औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:09 IST

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी ‘शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत’ (आरटीई) २५ टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश न दिलेल्या याचिकाकर्त्यांविरुद्ध पुढील सुनावणीपर्यंत (२८ फेब्रुवारी २०१८) शासनाने कोणतीही कारवाई करू नये, अशा आशयाचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांनी दिला आहे. 

औरंगाबाद : २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी ‘शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत’ (आरटीई) २५ टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश न दिलेल्या याचिकाकर्त्यांविरुद्ध पुढील सुनावणीपर्यंत (२८ फेब्रुवारी २०१८) शासनाने कोणतीही कारवाई करू नये, अशा आशयाचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांनी दिला आहे. 

सहायक सरकारी वकिलांच्या विनंतीवरून शेवटची संधी म्हणून खंडपीठाने प्रतिवाद्यांना याचिकेच्या अनुषंगाने उत्तर दाखल करण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. जर वरील निर्धारित वेळेत प्रतिवाद्यांनी उत्तर दाखल केले नाही, तर शासनाने शास्ती (कॉस्ट) म्हणून एक हजार रुपये जमा करावेत, असेही खंडपीठाने अंतरिम आदेशात म्हटले आहे, अशी माहिती आज एका पत्रपरिषदेत देण्यात आली. 

याबाबत माहिती देताना पदाधिका-यांनी सांगितले की,  इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनतर्फे १६ जानेवारी २०१८ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेद्वारे इंग्रजी शाळांमधील मागील पाच ते सहा वर्षांतील आरटीई प्रवेशापोटी प्रलंबित फी परतावा देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयात जाण्यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून ही मागणी शासनाकडे केली होती; पण त्यावर काहीही निर्णय झाला नाही. अखेरीस चालू शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला. शासनाच्या दबावाला बळी पडून अनेक शाळांनी नाइलाजास्तव आरटीईअंतर्गत नोंदणी केली. मात्र, ३,००० हून अधिक शाळांनी शासनाच्या दबाव तंत्राला न घाबरता नोंदणी केली नाही. काही ठिकाणी शासनाने शिक्षण विभागाच्या कार्यालयातून शाळा ‘आॅटो रजिस्टर’ करून घेतल्या. त्यासाठी शाळेचे ‘युजरनेम’ आणि ‘पासवर्ड’चा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले. या सर्व बाबी असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. अ‍ॅड. सुदर्शन साळुंके आणि अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांनी न्यायालायासमक्ष संघटनेची बाजू मांडली. पत्रकार परिषदेला असोसिएशनच्या प्र्रदेशाध्यक्ष जागृती धर्माधिकारी, प्रदेश कार्याध्यक्ष भरत भांदरगे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दायमा, प्रदेश सचिव राजेंद्र सिंग आणि औरंगाबादचे विभागप्रमुख योगेश देसरडा, फेरोज सौदागर, चंद्रशेखर जगताप, अनिल जीवनवाल, एम.जी. बेग आदी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाHigh Courtउच्च न्यायालयAurangabadऔरंगाबाद