शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षण अधिकार’मध्ये या वर्षात प्रवेश न दिलेल्यांना औरंगाबाद खंडपीठाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:09 IST

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी ‘शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत’ (आरटीई) २५ टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश न दिलेल्या याचिकाकर्त्यांविरुद्ध पुढील सुनावणीपर्यंत (२८ फेब्रुवारी २०१८) शासनाने कोणतीही कारवाई करू नये, अशा आशयाचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांनी दिला आहे. 

औरंगाबाद : २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी ‘शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत’ (आरटीई) २५ टक्के मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश न दिलेल्या याचिकाकर्त्यांविरुद्ध पुढील सुनावणीपर्यंत (२८ फेब्रुवारी २०१८) शासनाने कोणतीही कारवाई करू नये, अशा आशयाचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांनी दिला आहे. 

सहायक सरकारी वकिलांच्या विनंतीवरून शेवटची संधी म्हणून खंडपीठाने प्रतिवाद्यांना याचिकेच्या अनुषंगाने उत्तर दाखल करण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. जर वरील निर्धारित वेळेत प्रतिवाद्यांनी उत्तर दाखल केले नाही, तर शासनाने शास्ती (कॉस्ट) म्हणून एक हजार रुपये जमा करावेत, असेही खंडपीठाने अंतरिम आदेशात म्हटले आहे, अशी माहिती आज एका पत्रपरिषदेत देण्यात आली. 

याबाबत माहिती देताना पदाधिका-यांनी सांगितले की,  इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनतर्फे १६ जानेवारी २०१८ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेद्वारे इंग्रजी शाळांमधील मागील पाच ते सहा वर्षांतील आरटीई प्रवेशापोटी प्रलंबित फी परतावा देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयात जाण्यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून ही मागणी शासनाकडे केली होती; पण त्यावर काहीही निर्णय झाला नाही. अखेरीस चालू शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला. शासनाच्या दबावाला बळी पडून अनेक शाळांनी नाइलाजास्तव आरटीईअंतर्गत नोंदणी केली. मात्र, ३,००० हून अधिक शाळांनी शासनाच्या दबाव तंत्राला न घाबरता नोंदणी केली नाही. काही ठिकाणी शासनाने शिक्षण विभागाच्या कार्यालयातून शाळा ‘आॅटो रजिस्टर’ करून घेतल्या. त्यासाठी शाळेचे ‘युजरनेम’ आणि ‘पासवर्ड’चा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले. या सर्व बाबी असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. अ‍ॅड. सुदर्शन साळुंके आणि अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांनी न्यायालायासमक्ष संघटनेची बाजू मांडली. पत्रकार परिषदेला असोसिएशनच्या प्र्रदेशाध्यक्ष जागृती धर्माधिकारी, प्रदेश कार्याध्यक्ष भरत भांदरगे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दायमा, प्रदेश सचिव राजेंद्र सिंग आणि औरंगाबादचे विभागप्रमुख योगेश देसरडा, फेरोज सौदागर, चंद्रशेखर जगताप, अनिल जीवनवाल, एम.जी. बेग आदी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाHigh Courtउच्च न्यायालयAurangabadऔरंगाबाद