‘पाणलोट’चे कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

By Admin | Updated: May 30, 2014 00:35 IST2014-05-30T00:00:25+5:302014-05-30T00:35:29+5:30

हिंगोली : आॅनलाईन माहिती भरण्याच्या कारणावरून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे.

The contractual staff of the 'watershed' will not be paid | ‘पाणलोट’चे कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

‘पाणलोट’चे कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

 हिंगोली : आॅनलाईन माहिती भरण्याच्या कारणावरून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. परिणामी मागील तीन महिन्यांपासून पगाराअभावी काम करणार्‍या ९० कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात राज्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. हिंगोली जिल्ह्यात या कर्मचार्‍यांची संख्या ९० असून मागील तीन वर्षांपासून ते कार्यरत आहेत. पाणलोटच्या जनजागृतीपासून ते व्यवस्थापनापर्यंतची कामे हे कर्मचारी करतात. गावागावात जावून कर्मचारी पाणलोटबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतात. योजना चांगल्या रितीने राबविण्यासाठी योग्य तो सल्लाही कर्मचार्‍यांकडून दिला जातो. जिल्ह्यात तीन वर्षांपासून काम करणार्‍या या कर्मचार्‍यांवर मात्र संकट ओढवले आहे. पाणलोट अतंर्गत झालेल्या कामांची आॅनलाईन नोंद (एमआयएस) केली नसल्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्यात आले आहे. यापूर्वी या कर्मचार्‍यांना कृषी कार्यालयातील संगणकावर आॅलनाईन माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर कार्यालयाऐवजी नेटकॅफेवरून महिती भरण्याचा आदेश कृषी विभागाने दिला. लॅपटॉप किवा संगणक अशी कोणतीही सुविधा न देता आदेश दिल्यामुळे कर्मचारी गोंधळात पडले. कर्मचार्‍यांनी नेटकॅफेवर जावून माहिती भरण्याचा प्रयत्न केला असता नेहमी संकेतस्थळ जाम राहत असल्याची तक्रार आहे. त्यातच कृषी सहाय्यक आणि सुपरवायझरकडून माहिती देण्यात आली नसल्याने कर्मचार्‍यांना संगणकावर माहिती भरता आलेली नाही. परिणामी सलग तीन महिन्यांपासून या कर्मचार्‍यांना वेतनाअभावी काम करावे लागत आहे. पहिल्या महिन्यात वेतन रखडल्यानंतर दुसर्‍याही महिन्यात कर्मचार्‍यांचे वेतन करण्यात आले नाही. विशेष म्हणजे तिसरा महिनादेखील वेतनाविना गेला आहे. वेतनाअभावी या कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी घरून पैसे मागवावे लागत आहेत. दरम्यान वारंवार वेतनाची मागणी केल्यानंतरही कृषी विभागाकडून त्यांचे वेतन करण्यात आलेले नाही. सध्या या कर्मचार्‍यांचे कामात लक्ष लागत नसून त्यांना वेतनाअभावी आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाने कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन लवकर अदा करावे, अशी मागणी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खिल्लारे, सचिव सोळुंके यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार यांचा भ्रमणध्वनी लावला असता तो बंद होता. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ९० कर्मचार्‍यांना वेतनाची प्रतीक्षा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात राज्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत असून हिंगोली जिल्ह्यात मागील ३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या ९० आहे. पाणलोट अतंर्गत झालेले कामांची आॅनलाईन नोंद (एमआयएस) केली नसल्यामुळे जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन आले रोखण्यात आले आहे. वारंवार वेतनाची मागणी केल्यानंतरही कृषी विभागाकडून त्यांचे वेतन करण्यात आले नसल्यामुळे सध्या या कर्मचार्‍यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. लवकर वेतन करावे, अशी मागणी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खिल्लारे, सचिव सोळंके यांनी केली आहे.

Web Title: The contractual staff of the 'watershed' will not be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.