शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:55 PM

औरंगाबाद : थकीत बिलांसाठी मनपातील कंत्राटदारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दोन दिवसात देयके अदा करण्याची कार्यवाही झाली ...

ठळक मुद्देरोजेदार बांधव : कडक उन्हात मनपासमोर आंदोलन

औरंगाबाद : थकीत बिलांसाठी मनपातील कंत्राटदारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दोन दिवसात देयके अदा करण्याची कार्यवाही झाली नाहीत तर पाणीपुरवठा, विद्युत आदी अत्यावश्यक कामेही थांबविण्यात येतील, असा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे. उपोषणात अनेक रोजेदार बांधवांचाही समावेश आहे.महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा सर्वाधिक फटका विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना बसला आहे. तिजोरीत सध्या खडखडाट असल्यामुळे ठेकेदारांची जवळपास ३०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. उधारीवर साहित्य आणून कंत्राटदारांनी विकासकामे केली आहेत. थकीत बिले मिळावीत यासाठी एक वर्षापासून कंत्राटदार पाठपुरावा करीत आहेत. तिजोरीत पैसे नसल्यामुळे कंत्राटदारांच्या पदरी केवळ आश्वासने पडत आहेत. कंत्राटदारांनी आयुक्त, महापौरांना घेराव, मनपा मुख्यालयासमोर निदर्शने, उपोषण अशा प्रकारे अनेक वेळा आंदोलने केली. तरीही बिले न मिळाल्याने ठेकेदार आक्रमक झाले आहेत. सोमवारपासून या ठेकेदारांनी पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु पहिल्या दिवशी प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक हे सोमवारी मनपा मुख्यालयात आले; परंतु त्यांनी ठेकेदारांची भेट घेतली नाही. त्यामुळे ठेकेदार आणखी संतप्त झाले आहेत. आता दोन दिवसांत बिले मिळाली नाही तर विद्युत आणि पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक कामेही बंद करण्यात येतील, असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.विकासकामे ठप्पथकीत बिले मिळत नसल्यामुळे बहुसंख्य कंत्राटदारांनी पालिकेच्या कामांवर याआधीच अघोषित बहिष्कार टाकला आहे. विकासकामांच्या वारंवार निविदा मागवूनही ठेकेदार पुढे येण्यास तयार नाहीत. त्यामुळे किती तरी विकासकामे रखडली आहेत. आतापर्यंत विद्युत आणि पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक कामे सुरू आहेत. मात्र, आता तीही बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.आयुक्तांचे खाजगीत फोनवॉर्डांमधील विकासकामे ठप्प झाल्याने नगरसेवक थेट आयुक्तांकडे कामांसाठी तगादा लावत आहेत. आयुक्त ज्या कंत्राटदारांनी कामे घेतली आहेत, त्यांना काम सुरू करा म्हणून खाजगीत फोन करीत आहेत. कंत्राटदारांना २ लाख रुपये देतो, काम करा असे आश्वासन देत आहेत. यानंतरही कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत.-----------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका