शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

काहीही करून आरक्षण संपवायचा कट, वंचितांनी एकत्र येण्याचे प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 19:07 IST

आरएसएसवाले हिंदुत्व धोक्यात आल्याचे सांगत आहेत. हा फसवा प्रचार आहे: प्रकाश आंबेडकर

वैजापूर : सध्या सर्वच आरक्षण हे धोक्यात आले आहे. काहीही करून आरक्षण संपवायचा कट आखण्यात आला आहे. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी यांनी एकत्र यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

अहिल्या संदेश यात्रेचा समारोप बुधवारी वैजापूर येथे झाला. यावेळी ते बोलत होते. वैजापूर तालुक्यात दहा दिवसांपासून अहिल्या संदेश यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेच्या समारोपप्रसंगी ॲड. प्रकाश आंबेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसींनी जागरूक होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आरएसएसवाले हिंदुत्व धोक्यात आल्याचे सांगत आहेत. हा फसवा प्रचार आहे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब जानराव यांनी केले. यावेळी रंगनाथ जाधव, मुकुंदराजे होळकर, बापूसाहेब शिंदे, अंजनीताई आंबेडकर, प्रभाकर बडले, गोविंद दळवी, योगेश भड, विपीन साळवे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabadऔरंगाबाद