शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बाबासाहेबांना बाप मानलं, भय्यासाहेबांना भाऊ मानलं, आम्हाला मुलं मानून साथ द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 3:54 PM

रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी घातली भावनिक साद

औरंगाबाद : ‘डॉ. बाबासाहेबांना बाप मानता, भय्यासाहेबांना भाऊ मानता, आम्हाला मुले माना,’ अशी भावनिक साद सोमवारी येथे रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेला घातली. ते म्हणाले, ‘भय्यासाहेब बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी राबराब राबले, हे कुणालाही विसरता येणार नाही.’

ते मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद हिरोडे हे होते. बाबासाहेबांचा खरा सन्मान भय्यासाहेबांनी केला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळवून चैत्यभूमी उभी केली, याचा इतिहास आनंदराज यांनी उलगडून सांगितला.

भीम शाहीर मेघानंद जाधव यांनी भीमगीते गायिली. प्रा. महादेव उबाळे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. प्रमोद हिरोडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप वाकडे यांनी केले. प्रा. संजीव बोधनकर, किशोर जोहरे, मिलिंद बनसोडे, मधुरा गोरे, डॉ. भास्कर साळवी, ज्योती हिवाळे, डॉ. पूर्वा कार्तिक आदींची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पीईएसचे उपाध्यक्ष डॉ. डी. जी. देशकर यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणीप्रश्नावर केलेल्या कार्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. नजीकच्या काळात संपूर्ण पीईएस आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चालेल, असे संकेतही देशकर यांनी दिले. विजय वाकोडे यांनी नाव न घेता रामदास आठवले यांच्यावर टीका केली. भय्यासाहेबांकडे आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व जाऊ नये याचे प्रयत्न केले गेले, असा आरोप प्रा. हृषीकेश कांबळे यांनी केला. सा. बां. खात्याचे औरंगाबादचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांचेही भाषण झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNagsen vanनागसेन वन