शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सिल्लोड येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे आमरण उपोषण; ९ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 19:49 IST

सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनेआमरण उपोषण सुरु आहे.

सिल्लोड (औरंगाबाद ) : सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी २१ पैकी ०९ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यातील चौघांची प्रकृती जास्त प्रमाणात खालावली असून एका उपोषणकर्त्याला सिल्लोड येथील रुग्णालयात अतिवदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. 

सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड व सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करावे, अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. सोळा दिवसा पासून चक्री उपोषण केल्यावर प्रशासनाने याची दखल न घेतल्याने बुधवार पासून २१ उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. 

यातील निजाम पठाण या उपोषणकर्त्याचा अचानक रक्तदाब वाढल्याने त्यांना सिल्लोड येथील रुग्णालयात अतिवदक्षता विभागात पाठवावे लागले. इतर उपोषणकर्त्यांना वैद्यकीय पथकाने उपचार घेण्याचा सल्ला दिला परंतु त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास सपशेल नकार दिला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसagitationआंदोलनFarmerशेतकरी