शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच लातूरचा विकास करू शकते

By admin | Updated: October 12, 2014 00:45 IST

लातूर : विलासराव देशमुख आणि माझे वडील माधवराव शिंदे हे लोकनायक नेते होते. माझे भाऊ अमित देशमुखच विलासरावांनी केला तसा लातूरचा विकास करु शकतात.

लातूर : विलासराव देशमुख आणि माझे वडील माधवराव शिंदे हे लोकनायक नेते होते. माझे भाऊ अमित देशमुखच विलासरावांनी केला तसा लातूरचा विकास करु शकतात. मंत्रीपदाच्या शंभर दिवसात दीड हजार कोटीची विकासकामे खेचून आणणाऱ्या अमित देशमुखांच्या पाठीमागे लातूरकरांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी दुपारी हनुमान चौकात झालेल्या सभेत केले. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख, आ. बसवराज पाटील, महापौर स्मिता खानापुरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अलि अजिजी, आ. वैजनाथ शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, धीरज देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. लातूरकरांचे शनिवारी ज्योतिरादित्य हे खास आकर्षण ठरले. भरगच्च लातुरकरांच्या उपस्थितीत त्यांनी लातुरकरांना जिंकून घेतले. अमित देशमुख आणि ज्योतिरादित्य शिंदे ही जोडगोळी मंचावर येताच टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांचे जंगी स्वागत झाले. आपल्या अस्खलित मराठीतून बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी लातूरकरांना जिंकले. पुढे बोलताना अमित देशमुखांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. लातूरचा हा सुपूत्र आपल्या वडीलांप्रमाणेच राज्यात नाव करणार असल्याचे सांगून शंभर दिवसाच्या मंत्रीपदाच्या काळात दीड हजार कोटीची विकास कामे हा विक्रम केला आहे. विलासराव देशमुखांसारखे लोकनेते या लातूरने देशाला दिले होते. माझ्या वडीलांशी विलासरावांचे खुप चांगले संबंध होते. ते दोघे जवळचे मित्र होते. त्यांच्या सारखा विकासपुरुष होणे नाही. जसे लातूरकर विलासरावांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीले, तसेच अमित देशमुखांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार यात शंका नाही. कारण विलासरावांचा वारसा अमित देशमुख मोठ्या खुबीने चालवित आहेत. देशमुख परिवाराने लातूरच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. भाजपा हा जातीयवादाचे विष पेरणारा पक्ष आहे. सत्तेत आल्यावर लोक कसे बदलतात याचे उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. चीन, पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे मोदी चीनच्या राष्ट्रपतींबरोबर झुल्यावर बसून वार्तालाप करीत होते. तेव्हा चीन देशावर कुरघोड्या करीत होता. कुठे गेली ती मोदींची प्रचारातील भाषा ? असा सवालही त्यांनी केला. आपल्या ओघवत्या भाषणात ज्योतिरादित्य यांनी लातूरकरांना जिंकून घेतले. यावेळी अली अजिजी म्हणाले, काँग्रेसने सर्व समाजाच्या विकासासाठी भरभरून प्रयत्न केले आहेत. अजूनही पक्षाचे धोरण सर्वसामान्यांचा विकास हेच आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मतदान करावे, असे त्यांनी सांगितले.प्रारंभी व्यंकट बेद्रे यांनी प्रास्ताविक केले तर काँग्रेस शहराध्यक्ष मोईज शेख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)