शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात काँग्रेस सक्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस दिसतेय निष्क्रिय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:53 IST

ऐन कोरोना काळातच जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेसच्या नेतृत्वात बदल झाले.

ठळक मुद्दे काँग्रेसचे नवे नेतृत्व उमेदीने लागलेय कामालादुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कोरोनाच्या  काळात शांत जाणवत आहे.

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : कोरोना काळात काँग्रेस सक्रिय,  तर राष्ट्रवादी काँग्रेस निष्क्रिय झाल्याचे चित्र निदान औरंगाबाद शहरात व  जिल्ह्यात दिसून येत आहे. ऐन कोरोना काळातच जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेसच्या नेतृत्वात बदल झाले. नवे नेतृत्व उमेदीने कामाला लागलेले दिसते आहे.

काँग्रेस अलीकडे रस्त्यावर उतरून आंदोलनेही करीत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर काँग्रेसने जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. यापूर्वी पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तालुका पातळीवर जाऊन निदर्शने केली. केंद्र, प्रदेशकडून काँग्रेसला सतत कार्यक्रम दिले जात आहेत. हे कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी  त्या-त्या जिल्ह्याच्या व शहराच्या अध्यक्षांवर येऊन पडते. 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कोरोनाच्या  काळात शांत जाणवत आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शहरात दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी होते हा भाग निराळा; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेसच्या तुलनेत कमीच कार्यक्रम दिसून येत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे हे राष्ट्रवादीचे. यांचा मतदारसंघ संपूर्ण मराठवाडा जरी असला तरी त्यांचे वास्तव्य औरंगाबादेत आहे. हे दोघेही आमदार सध्यातरी पक्षाच्या दृष्टिकोनातून  जिल्ह्यात फारसे सक्रिय नसल्याचे दिसते. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास पाटील हे वेळ मिळेल तसे राष्ट्रवादी भवन पक्ष कार्यालयात बसतात. शहराध्यक्ष विजय साळवे यांचा प्रारंभी उत्साह होता; परंतु आता ते सक्रिय  नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कदीर मौलाना यांच्या शिफारसीने विजय साळवे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन साळवे यांना बदलण्यात यावे व त्यांच्या जागी मुस्लिम शहराध्यक्ष नेमावा असा सूर वाढला असल्याचे कळते.

काँग्रेसच्या विविध आघाड्याही कार्यरत काँग्रेसच्या विविध सेल विभागाचे कार्यक्रमही सध्या वाढलेले आहेत. काँग्रेसच्या दिव्यांग सेलतर्फे दिव्यांगांचे प्रश्न ऐरणीवर आणले गेले, तर काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने निदर्शने करून उत्तर प्रदेशात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना झालेल्या अटकेचा निषेध नोंदवला.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित राहून वाटेत औरंगाबाद मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व नंतर पत्रकारांशीही संवाद साधला. शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न घेऊन विविध शिष्टमंडळेही त्यांना भेटली. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मंत्री कोरोना काळात औरंगाबादकडे फिरकला नाही. अपवाद फक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा. 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद