शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:55 PM

फुलंब्री तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी केल्या. गरज असेल तेथे पाण्याचे स्रोत शोधून नव्याने प्रस्ताव तयार करा. मोठ्या गावांच्या योजनांसाठी थेट जायकवाडीतून पाणी आणण्याच्या दृष्टीने योजना आखण्याची सूचनाही त्यांनी केली. मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना, खरीप हंगाम तयारी, शेतकरी मार्गदर्शन, रोजगार हमी कामांसंबंधीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी केल्या. गरज असेल तेथे पाण्याचे स्रोत शोधून नव्याने प्रस्ताव तयार करा. मोठ्या गावांच्या योजनांसाठी थेट जायकवाडीतून पाणी आणण्याच्या दृष्टीने योजना आखण्याची सूचनाही त्यांनी केली. मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना, खरीप हंगाम तयारी, शेतकरी मार्गदर्शन, रोजगार हमी कामांसंबंधीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला जिल्हाधिकारी उदय चौधरी, जि. प. सीईओ पवनीत कौर, उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले, बीडीओ एम. सी. राठोड यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील बहुतांश गावातील पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. त्या योजना तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. मान्सूनचे आगमन होत आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी कृषी विभागाने कशी केली आहे, बियाणे-खतांची आवश्यकता आणि उपलब्धता, संभाव्य किडींचा प्रादुर्भाव व इतर संकटे आणि त्यावरील उपाययोजनांविषयी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बागडे यांनी माहिती घेतली. रोजगार हमीच्या कामांची माहिती घेत मजुरांना वेळेवर काम उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही बागडे यांनी दिल्या. तसेच सावंगी आणि पिसादेवीसाठी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतून पाणीपुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादWaterपाणी