शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या पारधी महिलेच्या वारसांना नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 19:04 IST

मृताचा मुलगा साहेबा गजानन काळे व भाऊ गिरीश चव्हाण यांनी २००८ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

ठळक मुद्दे आदेशापासून ४५ दिवसांत ही रक्कम जमा न केल्यास त्यावर ८ टक्के व्याज आकारण्यात येईलसंबंधित महिलेचे १६ मे २००७ रोजी पोलीस कोठडीत निधन झाले.

औरंगाबाद : नगर येथील पोलीस कोठडीत संशयास्पदरित्या मृत्यू झालेली पारधी महिला सुमन काळे हिच्या वारसांना ५ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून राज्य शासनाने द्यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिले आहेत. आदेशापासून ४५ दिवसांत ही रक्कम जमा न केल्यास त्यावर ८ टक्के व्याज आकारण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. १६ मे २००७ रोजी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणातील खटला सहा महिन्यांत निकाली काढावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दोषारोपपत्र दाखल करताना, कट रचून खून करणे आणि पुरावा नष्ट केल्याची बाबही तपासून पाहावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

नगरच्या ५ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी एका चोरी प्रकरणात सुमन काळे या पारधी महिलेकडून एक किलो सोने हस्तगत करण्यासाठी १२ मे २००७ रोजी तिला ताब्यात घेतले होते. संबंधित महिला पोलिसांची खबरी होती व त्यांना मदत करायची. तसेच ती सामाजिक कार्यातही सक्रिय होती. तिला ताब्यात घेतल्याची नोंद नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. नगर गुन्हे शाखेत नेल्याचीही नोंद नव्हती आणि नंतर तिला जामखेड येथील गेस्ट हाऊसला नेण्यात आले होते. महिलेचा भाऊ, मुलास तिला भेटू देण्यात आले नाही.

पोलीस मुख्यालय, नगर येथील डॉ. सोनाली गाढे-निकम यांनी सुमनला शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्याऐवजी खासगी रुग्णालय दीपक हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉ. एस. दीपक सुब्रमण्यम यांनी एमएलसी न पाठविता डोक्याला गंभीर दुखापत असताना विष प्राशन केल्यावरचा उपचार केला. संबंधित महिलेचे १६ मे २००७ रोजी पोलीस कोठडीत निधन झाले. शवविच्छेदन अहवालात मृताच्या अंगावर १२ जखमा असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील नऊ जखमा मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले.

सुमनकडून एक किलो सोने जप्त करायचे होते, असे पोलिसांचे म्हणणे होते; परंतु त्यासाठी कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. केमिकल ॲनालायझर अहवालात सुमनने विष प्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाले. मृताचा मुलगा साहेबा गजानन काळे व भाऊ गिरीश चव्हाण यांनी २००८ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक तुकाराम कोंडिबा वाहिले, देविदास बाबूराव सोनवणे, सहायक फौजदार शिवाजी बाबूराव सुद्रीक, दीपक नानासाहेब हराळ, फौजदार अरुण देवकर, कॉन्स्टेबल बाळासाहेब शंकरराव अहिवले, सुनील सीताराम चव्हाण, डॉ. सुब्रमण्यम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस