शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या पारधी महिलेच्या वारसांना नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 19:04 IST

मृताचा मुलगा साहेबा गजानन काळे व भाऊ गिरीश चव्हाण यांनी २००८ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

ठळक मुद्दे आदेशापासून ४५ दिवसांत ही रक्कम जमा न केल्यास त्यावर ८ टक्के व्याज आकारण्यात येईलसंबंधित महिलेचे १६ मे २००७ रोजी पोलीस कोठडीत निधन झाले.

औरंगाबाद : नगर येथील पोलीस कोठडीत संशयास्पदरित्या मृत्यू झालेली पारधी महिला सुमन काळे हिच्या वारसांना ५ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून राज्य शासनाने द्यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिले आहेत. आदेशापासून ४५ दिवसांत ही रक्कम जमा न केल्यास त्यावर ८ टक्के व्याज आकारण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. १६ मे २००७ रोजी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणातील खटला सहा महिन्यांत निकाली काढावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दोषारोपपत्र दाखल करताना, कट रचून खून करणे आणि पुरावा नष्ट केल्याची बाबही तपासून पाहावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

नगरच्या ५ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी एका चोरी प्रकरणात सुमन काळे या पारधी महिलेकडून एक किलो सोने हस्तगत करण्यासाठी १२ मे २००७ रोजी तिला ताब्यात घेतले होते. संबंधित महिला पोलिसांची खबरी होती व त्यांना मदत करायची. तसेच ती सामाजिक कार्यातही सक्रिय होती. तिला ताब्यात घेतल्याची नोंद नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. नगर गुन्हे शाखेत नेल्याचीही नोंद नव्हती आणि नंतर तिला जामखेड येथील गेस्ट हाऊसला नेण्यात आले होते. महिलेचा भाऊ, मुलास तिला भेटू देण्यात आले नाही.

पोलीस मुख्यालय, नगर येथील डॉ. सोनाली गाढे-निकम यांनी सुमनला शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्याऐवजी खासगी रुग्णालय दीपक हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉ. एस. दीपक सुब्रमण्यम यांनी एमएलसी न पाठविता डोक्याला गंभीर दुखापत असताना विष प्राशन केल्यावरचा उपचार केला. संबंधित महिलेचे १६ मे २००७ रोजी पोलीस कोठडीत निधन झाले. शवविच्छेदन अहवालात मृताच्या अंगावर १२ जखमा असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील नऊ जखमा मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले.

सुमनकडून एक किलो सोने जप्त करायचे होते, असे पोलिसांचे म्हणणे होते; परंतु त्यासाठी कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. केमिकल ॲनालायझर अहवालात सुमनने विष प्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाले. मृताचा मुलगा साहेबा गजानन काळे व भाऊ गिरीश चव्हाण यांनी २००८ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक तुकाराम कोंडिबा वाहिले, देविदास बाबूराव सोनवणे, सहायक फौजदार शिवाजी बाबूराव सुद्रीक, दीपक नानासाहेब हराळ, फौजदार अरुण देवकर, कॉन्स्टेबल बाळासाहेब शंकरराव अहिवले, सुनील सीताराम चव्हाण, डॉ. सुब्रमण्यम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस