शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थाच्या निवडणुकीचा बिगूल

By admin | Updated: October 17, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीचा आखाडा शांत होतो न होतो तोच संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्हाभरात ८७९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे.

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीचा आखाडा शांत होतो न होतो तोच संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्हाभरात ८७९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. डिसेंबरपूर्वी या सर्व संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत आयोगाने कळविले आहे. त्यानुसार प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तेरणासोबतच अन्य सहा कारखान्याची निवडणूक होणार आहे.जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था संचालक मंडळाची मुदत संपूनही विविध कारणांमुळे निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. जवळपास २०१०-११ पासून निवडणूका झाल्याच नाहीत. तब्बल पाच वर्षानंतर अशा संस्थांच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. यामध्ये ८७९ संस्था निवडणुकीसाठी पात्र ठरल्या आहेत. या संस्थांची राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत निवडणूक घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी घेणे अनिवार्य आहे. सदरील निवडी तीन टप्प्यात होणार आहेत. यामध्ये ‘अ’ वर्गातील ६ कारखान्यांचा समावेश आहे. यात बाणगंगा सहकारी साखर कारखाना ईडा, भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना समुद्राळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना केशेगाव, तेरणा साखर कारखाना ढोकी, विठ्ठलसाई साखर कारखाना मुरुम आणि शिवशक्ती साखर कारखाना वाशी यांचा समावेश आहे. त्यानंतर गट ‘ब’ मधील तीन नागरी बँका, सहा नागरी पतसंस्था, ५० विविध कार्यकारी सोसायट्या आणि ७ खरेदीविक्री संघाचा समावेश आहे. ‘क’ वर्गामध्ये ८७ नागरी पतसंस्था (एक कोटीपेक्षा कमी ठेवी असलेल्या), ९३ विविध कार्यकारी सोसायट्या (१० लाखापेक्षा कमी भागभांडवल असलेल्या), १ पाणीपुरवठा संस्था आणि इतर १२६ संस्थांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)सहकारी संस्थांचे संचालक मंडळ हे जास्तीत जास्त २१ सदस्यांचे असणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती/जमाती, इतरमागासप्रवर्ग आणि भटक्या जाती/जमाती प्रत्येकी एक, दोन महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील सहा ते सोळा सभासदांचे मिळून संचालक मंडळ असणार आहे. ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी सहकार खात्यासोबतच अन्य विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, वकील, प्रमाणित लेखा परिक्षक, सहकारी बँकाचे अधिकारी यांचे पॅनल निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणार आहे. या वर्गामध्ये २३८ संस्था असून, या संस्थांचा निवडणूक कृती कार्यक्रम तयार करुन तो निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळताच प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.