शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:54 IST

सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यावा

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील सरकार बेकादेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टांनी दिलेल्या निकालातून स्पष्ट झालं. यामुळे नैतिक पातळीवर शिंदे- फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.

यापूर्वी शिवाजी पाटील निलंगेकर यांनी केवळ आरोप झाल्याने मुख्यमंत्री पद सोडले होते. न्यायालयाच्या निकालानंतर तर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिंदे- फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. जनाची नाही तर मनाची असेल तर या सरकारने राजीनामा द्यावा, आपणा फक्त सत्तेसाठी जन्मलो आहोत का? सर्वकाही बेकायदेशीर झाले असेल तर, कसे काय खुर्चीला चिटकून बसता, असा सवाल दानवे यांनी केला.

सर्वकाही अनैतिक सुरु होते, राज्यपालांनी चुकीचे निर्णय घेतले. अशा परस्थितीत उद्धव ठाकरे हे काही सत्तेला चिटकून बसणारे नाहीत. यामुळे ठाकरे यांनी राजीनामा दिला. हा त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य होता, असे स्पष्टीकरण दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर दिले.  निवडणूक आयोगाला देखील या सर्व निकालाची माहिती मिळाली असेल. यामुळे आयोग पुढील निर्णय नक्कीच घेईल. तसेच विधानसभा अध्यक्ष देखील कायद्याला धरून त्यांची जबाबदारी पार पाडतील, अशी अपेक्षा देखील दानवे यांनी व्यक्त केली.  

कोर्टाने चुकांवर बोट ठेवलं; पण शेवटी शिंदे सरकार तरलं!शिंदे गटानं नियुक्त केलेल्या भरत गोगावले यांची नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने नबाम रेबिया प्रकरणा मोठ्या घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. तर अध्यक्षांच्या अधिकारांचं प्रकरणही ७ सदस्यीय घटनापीठाकडे पाठवले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने राज्यपालांवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांकडे बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती, असेही सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर करता येता कामा नये, असंही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. मात्र, अंतिम निकालामध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी नियुक्त करणार येणार नाही. तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आम्ही निर्णय घेणार नाही. तर अपात्रतेचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष घेतील, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदे