शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:54 IST

सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यावा

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील सरकार बेकादेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टांनी दिलेल्या निकालातून स्पष्ट झालं. यामुळे नैतिक पातळीवर शिंदे- फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.

यापूर्वी शिवाजी पाटील निलंगेकर यांनी केवळ आरोप झाल्याने मुख्यमंत्री पद सोडले होते. न्यायालयाच्या निकालानंतर तर हे सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिंदे- फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. जनाची नाही तर मनाची असेल तर या सरकारने राजीनामा द्यावा, आपणा फक्त सत्तेसाठी जन्मलो आहोत का? सर्वकाही बेकायदेशीर झाले असेल तर, कसे काय खुर्चीला चिटकून बसता, असा सवाल दानवे यांनी केला.

सर्वकाही अनैतिक सुरु होते, राज्यपालांनी चुकीचे निर्णय घेतले. अशा परस्थितीत उद्धव ठाकरे हे काही सत्तेला चिटकून बसणारे नाहीत. यामुळे ठाकरे यांनी राजीनामा दिला. हा त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य होता, असे स्पष्टीकरण दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर दिले.  निवडणूक आयोगाला देखील या सर्व निकालाची माहिती मिळाली असेल. यामुळे आयोग पुढील निर्णय नक्कीच घेईल. तसेच विधानसभा अध्यक्ष देखील कायद्याला धरून त्यांची जबाबदारी पार पाडतील, अशी अपेक्षा देखील दानवे यांनी व्यक्त केली.  

कोर्टाने चुकांवर बोट ठेवलं; पण शेवटी शिंदे सरकार तरलं!शिंदे गटानं नियुक्त केलेल्या भरत गोगावले यांची नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने नबाम रेबिया प्रकरणा मोठ्या घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. तर अध्यक्षांच्या अधिकारांचं प्रकरणही ७ सदस्यीय घटनापीठाकडे पाठवले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने राज्यपालांवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांकडे बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती, असेही सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर करता येता कामा नये, असंही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. मात्र, अंतिम निकालामध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी नियुक्त करणार येणार नाही. तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आम्ही निर्णय घेणार नाही. तर अपात्रतेचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष घेतील, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदे