शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 13:28 IST

Heavy RainFall in Marathawada : ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १९ टक्के पंचनामे पूर्ण झाले २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पथके

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ( Heavy RainFall in Marathawada) २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची या महिन्याच्या १४ तारखेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम विभागीय पातळीवर सुरू असून, आजवर १९ टक्के शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत महसूल, कृषी विभागाची पथके पोहोचली आहेत. ( Cloudburst at 42 places in Marathwada; Massive loss of 20 lakh 39 thousand farmers) 

हेक्टरचा विचार केला तर २५ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनाम्याअंती किती हेक्टवरील पिके वाया गेली, त्याचा अहवाल समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले. १ सप्टेंबरपासून आजवर कमी-अधिक प्रमाणात विभागात अतिवृष्टी झाली. सुमारे २५० मंडळांत पावसाने दाणादाण उडवून दिली. यात कापूस, मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक वाया गेले. त्याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे.

४२ ठिकाणी ढगफुटी; मराठवाडा हादरला७ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. मराठवाड्यात सर्वाधिक ४२ हून अधिक ठिकाणी असा पाऊस एकाच दिवसात झाला. या पावसामुळे जीवितहानी झाली, पशुधनाचे नुकसान झाले. शिवाय घरांची पडझड, रस्ते, पूल खचले. मराठवाड्यात लाखो एकर शेतीचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले. कापूस, तूर, मूग, मका, सोयाबीन, बाजरीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीची आगाऊ सूचना मिळावी, यासाठी डॉप्लर रडार विभागात बसविणे आवश्यक आहे. वित्त व जीवितहानी तसेच शेतीचे नुकसान टाळण्यासाठी डॉप्लर रडार मराठवाड्यात तातडीने बसविणे गरज असल्याचे हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

जिल्हा-----बाधित शेतकरी---- झालेले पंचनामे---टक्केवारी

औरंगाबाद-- ३२६९३५ ------ २९३२८-------१७ टक्के

जालना----२६१२९८------ २६०६३-------११ टक्के

परभणी---२२२७९४ ------ २२९४४-------१४ टक्के

हिंगोली---११५०० ------ १०२५--------११ टक्के

नांदेड----४५१५८८------- २९६७२-------०७ टक्के

बीड-----७३७२२५----- १५०६६०------२९ टक्के

लातूर----८४९० ------ २५७४--------४० टक्के

उस्मानानाबाद--१९२२८------ ८४६०--------८० टक्के

एकूण -----२०३९६८८-----२७०७२७--------१८ टक्के

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद