शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 13:28 IST

Heavy RainFall in Marathawada : ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १९ टक्के पंचनामे पूर्ण झाले २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पथके

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ( Heavy RainFall in Marathawada) २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची या महिन्याच्या १४ तारखेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम विभागीय पातळीवर सुरू असून, आजवर १९ टक्के शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. २ लाख ७० हजार शेतकऱ्यांपर्यंत महसूल, कृषी विभागाची पथके पोहोचली आहेत. ( Cloudburst at 42 places in Marathwada; Massive loss of 20 lakh 39 thousand farmers) 

हेक्टरचा विचार केला तर २५ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनाम्याअंती किती हेक्टवरील पिके वाया गेली, त्याचा अहवाल समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले. १ सप्टेंबरपासून आजवर कमी-अधिक प्रमाणात विभागात अतिवृष्टी झाली. सुमारे २५० मंडळांत पावसाने दाणादाण उडवून दिली. यात कापूस, मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटीप्रमाणे पाऊस बरसला असून, विभागातील ७० हून अधिक मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक वाया गेले. त्याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे.

४२ ठिकाणी ढगफुटी; मराठवाडा हादरला७ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. मराठवाड्यात सर्वाधिक ४२ हून अधिक ठिकाणी असा पाऊस एकाच दिवसात झाला. या पावसामुळे जीवितहानी झाली, पशुधनाचे नुकसान झाले. शिवाय घरांची पडझड, रस्ते, पूल खचले. मराठवाड्यात लाखो एकर शेतीचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले. कापूस, तूर, मूग, मका, सोयाबीन, बाजरीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीची आगाऊ सूचना मिळावी, यासाठी डॉप्लर रडार विभागात बसविणे आवश्यक आहे. वित्त व जीवितहानी तसेच शेतीचे नुकसान टाळण्यासाठी डॉप्लर रडार मराठवाड्यात तातडीने बसविणे गरज असल्याचे हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

जिल्हा-----बाधित शेतकरी---- झालेले पंचनामे---टक्केवारी

औरंगाबाद-- ३२६९३५ ------ २९३२८-------१७ टक्के

जालना----२६१२९८------ २६०६३-------११ टक्के

परभणी---२२२७९४ ------ २२९४४-------१४ टक्के

हिंगोली---११५०० ------ १०२५--------११ टक्के

नांदेड----४५१५८८------- २९६७२-------०७ टक्के

बीड-----७३७२२५----- १५०६६०------२९ टक्के

लातूर----८४९० ------ २५७४--------४० टक्के

उस्मानानाबाद--१९२२८------ ८४६०--------८० टक्के

एकूण -----२०३९६८८-----२७०७२७--------१८ टक्के

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद