शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शहर पाणीपुरवठा योजना १,६८० वरून २,७०० कोटींवर; केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:25 IST

१ हजार २० कोटींच्या वाढीसह योजना २,७०० कोटींवर गेली आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने २०१९ साली शहरासाठी मंजूर केलेल्या १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये करण्यास मंजुरी मिळाली असून, १ हजार २० कोटींच्या वाढीसह योजना २,७०० कोटींवर गेली आहे.

नवीन योजनेत समावेश करताना मूळ किंमत १,६८० रुपये त्यात कंत्राटदारांनी स्टीलच्या भाववाढीमुळे मागणी केलेले ४२५ कोटी आणि ओ ॲण्ड एमआरचे (मटेरिअल रिव्ह्यू) ६०० कोटी याप्रमाणे सुमारे २,७०० कोटी रुपयांवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाही. जून महिन्यात १५ तारखेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १,६८० कोटींच्या योजनेचा आढावा घेतला, योजनेच्या कामाला ३ वर्षे लागणार असल्यामुळे जुनी ७०० मि.मी.ची जलवाहिनी पुनरुज्जीवित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मांडला, त्याचे अंदाजपत्रक २०० कोटींवर गेले. ठाकरे यांना ते कळविले; परंतु त्यांचे सरकार गेल्याने प्रशासकीय पातळीवरच या जुन्या व नवीन योजनेचा कारभार सुरू आहे.

शासनाने कशाला दिली मंजुरी?राज्य शासनाने केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये शहर पाणीपुरवठा योजनेचे दोन्ही टप्पे समावेश करण्यास मंजुरी दिली. १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होऊन वर्ष लोटले. पहिल्या टप्प्यात १,३४० कोटी रुपयांच्या निविदेचे काम जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनी करीत आहे. त्यात जलकुंभांची उभारणी, दोन एमबीआर, तीन जलशुद्धीकरण केंद्रे, १,९०० किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे शहरात टाकणे, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ४० कि.मी. अंतरात २,५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, जलकुंभांना जोडणारी जलवाहिनी टाकण्यासह इतर कामे करण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात या कामांचा समावेशदुसऱ्या टप्प्यात पम्पिंग स्टेशन उभारणे, नवीन पंप बसविणे व इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. सध्या काम सुरू असले तरी केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये योजनेचा समावेश करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. केंद्राच्या नियमानुसार योजनेमध्ये बदल करून २,७०० कोटी रुपयांचा डीपीआर मध्यंतरी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शासनाकडे सादर केला. यात मूळ किंमत १,६८० कोटी रुपये, कंत्राटदारांकडून वाढीव रक्कम ४२५ कोटी रुपये, अशी २,१०५ कोटी रुपये त्यात ओ अँड एमआरचे ६०० कोटी, अशी एकूण २,७०० कोटी रुपयांवर नवीन पाणीपुरवठा योजना गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनपाला भरावे लागणार ५४० कोेटीकेंद्र शासनाच्या अमृत-२ मधून नवीन पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असली तरी यामध्ये केंद्र, राज्य शासन व मनपाचा हिस्सा असेल. मनपाला साधारणपणे २० टक्के म्हणजे सुमारे ५४० कोटी टाकावे लागतील.

सातारा-देवळाई ड्रेनेजच्या डीपीआरचा समावेशसातारा-देवळाईसाठी २५४ कोटी रुपयांचा ड्रेनेजच्या डीपीआरचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठीदेखील निधी वाटपाचे सूत्र केंद्र, राज्य आणि मनपा असेच राहणार आहे. मनपाला हिस्सा भरावाच लागणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी