शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

शहर पाणीपुरवठा योजना १,६८० वरून २,७०० कोटींवर; केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:25 IST

१ हजार २० कोटींच्या वाढीसह योजना २,७०० कोटींवर गेली आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने २०१९ साली शहरासाठी मंजूर केलेल्या १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये करण्यास मंजुरी मिळाली असून, १ हजार २० कोटींच्या वाढीसह योजना २,७०० कोटींवर गेली आहे.

नवीन योजनेत समावेश करताना मूळ किंमत १,६८० रुपये त्यात कंत्राटदारांनी स्टीलच्या भाववाढीमुळे मागणी केलेले ४२५ कोटी आणि ओ ॲण्ड एमआरचे (मटेरिअल रिव्ह्यू) ६०० कोटी याप्रमाणे सुमारे २,७०० कोटी रुपयांवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून झालेला नाही. जून महिन्यात १५ तारखेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १,६८० कोटींच्या योजनेचा आढावा घेतला, योजनेच्या कामाला ३ वर्षे लागणार असल्यामुळे जुनी ७०० मि.मी.ची जलवाहिनी पुनरुज्जीवित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मांडला, त्याचे अंदाजपत्रक २०० कोटींवर गेले. ठाकरे यांना ते कळविले; परंतु त्यांचे सरकार गेल्याने प्रशासकीय पातळीवरच या जुन्या व नवीन योजनेचा कारभार सुरू आहे.

शासनाने कशाला दिली मंजुरी?राज्य शासनाने केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये शहर पाणीपुरवठा योजनेचे दोन्ही टप्पे समावेश करण्यास मंजुरी दिली. १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होऊन वर्ष लोटले. पहिल्या टप्प्यात १,३४० कोटी रुपयांच्या निविदेचे काम जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनी करीत आहे. त्यात जलकुंभांची उभारणी, दोन एमबीआर, तीन जलशुद्धीकरण केंद्रे, १,९०० किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे शहरात टाकणे, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ४० कि.मी. अंतरात २,५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, जलकुंभांना जोडणारी जलवाहिनी टाकण्यासह इतर कामे करण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात या कामांचा समावेशदुसऱ्या टप्प्यात पम्पिंग स्टेशन उभारणे, नवीन पंप बसविणे व इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. सध्या काम सुरू असले तरी केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये योजनेचा समावेश करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. केंद्राच्या नियमानुसार योजनेमध्ये बदल करून २,७०० कोटी रुपयांचा डीपीआर मध्यंतरी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शासनाकडे सादर केला. यात मूळ किंमत १,६८० कोटी रुपये, कंत्राटदारांकडून वाढीव रक्कम ४२५ कोटी रुपये, अशी २,१०५ कोटी रुपये त्यात ओ अँड एमआरचे ६०० कोटी, अशी एकूण २,७०० कोटी रुपयांवर नवीन पाणीपुरवठा योजना गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

मनपाला भरावे लागणार ५४० कोेटीकेंद्र शासनाच्या अमृत-२ मधून नवीन पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असली तरी यामध्ये केंद्र, राज्य शासन व मनपाचा हिस्सा असेल. मनपाला साधारणपणे २० टक्के म्हणजे सुमारे ५४० कोटी टाकावे लागतील.

सातारा-देवळाई ड्रेनेजच्या डीपीआरचा समावेशसातारा-देवळाईसाठी २५४ कोटी रुपयांचा ड्रेनेजच्या डीपीआरचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठीदेखील निधी वाटपाचे सूत्र केंद्र, राज्य आणि मनपा असेच राहणार आहे. मनपाला हिस्सा भरावाच लागणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी